शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच घटना -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:25 IST

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.हिंगोली येथे राष्टÑवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसलेल्या भाजपाच्या शाम जाजू यांनी त्यांच्या बद्दल बोलू नये, सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरूषांच्या नावाने मतभेद निर्माण करणे, जातीपातीत भांडणे लावणे हेच भाजपच्या लोकांचे मागील साडेतीन वर्षातील काम आहेत. मात्र आमच्या दैवताच्या वंशजांबद्दल असे बोलणे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर यापूर्वी यवतमाळ ते नागपूर अशी दिंडी यात्रा काढल्यामुळे सरकारला कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे भाग पडले. घाई-घाईत अर्धवट पैसे खात्यावर जमा करणे भाग पडले, बोंडअळी, धानावरील तुडतुडे यासाठी मदत, ओखी वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई आदी प्रश्नांवर सरकारला जाग आली. त्यामुळे आता मराठवाड्यातील प्रश्नांसाठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हिंगोलीतील हमीभाव केंद्रावर झालेल्या गैरप्रकारावर विचारले असता उडीद, मूग, तूर आदींची रक्कम न मिळाल्याच्या ६० ते ७० हमी केंद्रातील तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जाब विचारल्यानंतर केवळ परळीच्याच केंद्रावरील शेतकºयांना चुकारे मिळाले.येथील प्रकरणावर मी वरिष्ठांमार्फत अहवाल मागविणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून हल्लोबोल यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ९ दिवसांत २६ ठिकाणी सभा घेवून औरंगाबाद येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून ३ फेब्रुवारीला समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये मराठवाड्यातील शेतकरी, व्यापारी, तरूण, महिला यांच्याकडून विविध स्थानिक प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत. यावर सरकार विरूद्ध वज्रमूठ आवळली जाणार असल्याचे ते म्हणाले.हिंगोली जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी दोन ठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस आ. रामराव वडकुते, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, बसवराज पाटील, सोनाली देशमुख, दिलीपराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जगजीतराज खुराणा आदींची उपस्थिती होती.