शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:34 IST

दडपशाही पद्धतीने सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे: राजू शेट्टी

- गंगाधर सितळेडोंगरकडा (जि. हिंगोली) : 'शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या हरकती असताना, त्या हरकतींचे काय झाले? विनाकारण शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्यांवर दबाव आणू नये', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शासनाला दिला.

९ एप्रिल रोजी डोंगरकडा येथे शक्तिपीठ महामार्ग बंद करावा, या मागणीसाठी सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी डोंगरकडा व परिसरातील शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे. परंतु, डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या सूचनांकडे शासन लक्ष देण्यास तयार नाही. दडपशाही पद्धतीने सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा शक्तिपीठ महामार्ग डोंगरकडा येथून जाणार नाही. हा मार्ग सरकारने रद्द करायलाच पाहिजे, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

हरकतींचे पुढे काय झाले?शक्तिपीठ व्हावा की नाही यासाठी शेतकऱ्यांकडून हरकती घेणे आवश्यक आहे. या शक्तिपीठाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? हेही समजावून सांगायला पाहिजे. परंतु, दडपशाही करून शक्तिपीठ महामार्ग तयार केला जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात जात आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष प्रकाश पोपळे, ज्येष्ठ नेते किशनराव कदम-देलुबकर, हरिभाऊ कदम, नांदेड जिल्हा अध्यक्ष हनुमंत राजेगोरे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रावसाहेब अडकिने, हिंगोली जिल्हा युवा उपाध्यक्ष पराग अडकिने, उद्धवराव गावंडे, पिंटू गावंडे, छगन अडकिने, गजानन अडकिने, गजानन गावंडे, डिगंबर गावंडे, प्रदीप गावंडे, दत्ता सारंगे, संतोष साळवे, बंटी अडकिने, रामू अडकिने तसेच शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीHingoliहिंगोलीhighwayमहामार्ग