पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:48+5:302021-09-09T04:36:48+5:30
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत ...

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर पालिकेकडून पुरवठा होणारे पाणीही गढूळ असल्यासारखे दिसत आहे. धरणात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा रंग त्यालाही दिसत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले हे पाणीही पिवळसर रंगाचे असल्याने ते मातीमिश्रित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे क्लोरिनेशन झालेले असले तरीही उकळून प्यायल्यास इतर आजारांचा धोका टळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काळ पाणी उकळून प्यायल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येणे शक्य आहे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करावे. हातपंपांच्या आजूबाजूला घाण, उकीरडा साठू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ, अतिसार,
कावीळ झाल्यास ताप येणे, पोट दुखणे, मळमळ होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात.
हळूहळू आजार वाढत गेल्यास डोळ्यात पिवळेपण दिसते.
अतिसारात तर पोटदुखी, जुलाब, उलटी ही सामान्य लक्षणे दिसून येतात.
टायफॉईडमध्ये एक किंवा दोन दिवसाआड ताप येतो, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, अशी लक्षणे दिसून येतात.
सध्या अतिवृष्टीमुळे दूषित पाणी पिण्यात येऊ शकते. त्यामुळे ते उकळून व गाळून प्यावे. शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी दिली.
शहराला रोज चार ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यात विविध भागातील ८ टाक्यांवरून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तसा टाक्यांपर्यंत रोज आठ ते दहा एमएलडीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले असते. याशिवाय खासगी स्त्रोतांतूनही नागरिक पाणी उपसा करून त्याचा वापर करतात. काही भागात फिल्टरचे पाणीही नागरिक घेतात. एका नागरिकास दिवसाकाठी पिण्यास पाच ते सात लिटर पाणी लागते.