शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

अध्ययनस्तर निश्चितीत जिल्ह्याला ५१ टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:53 IST

जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले.

इलियास शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले.जिल्ह्यातील दुसरी ते आठवीची भाषा, गणित, इंग्रजी या तीन विषयांची अध्ययनस्तर निश्चिती झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थी झपाट्याने प्रगत व्हावेत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर निश्चित व्हावा, त्यांना भाषा विषयाचे लेखन, वाचन, गणितातील मूलभूत क्रिया याव्यात, यासाठी अध्ययनस्तर निश्चिती करण्यात आली. आता अध्ययन निष्पत्तीवर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण दुसरी ते आठवीचे ७५ हजार १३४ विद्यार्थी आहेत. भाषा विषयाची जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ६४.२६ टक्के, गणिताची ५४.०३ टक्के, इंग्रजीची ३५.७५ टक्के गुणवत्ता आली आहे. वसमत तालुक्याची सरासरी गुणवत्ता ५३.८७ टक्के, कळमनुरी तालुक्याची ५३.४८ टक्के, हिंगोली तालुका ५१.१२, औंढा ५०.५४ तर सेनगाव तालुक्याची सरासरी गुणवत्ता ४७.३८ टक्के आहे. विद्यार्थी कोणत्या विषयात मागे आहेत. कोणते घटक विद्यार्थ्यांना समजत नाहीत. याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.शाळा १०० टक्के प्रगत व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने अध्ययन निष्पत्तीवर भर देण्याचे ठरविले आहे. ही पहिली अध्ययनस्तर निश्चिती शाळेतील शिक्षकांकडून करून घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात जि.प.च्या ८८२ शाळा आहेत. या शाळेतील अध्यापन पद्धती विद्यार्थी अप्रगची कारणे, गुणवत्तेत विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत. याचीही चाचपणी शिक्षण विभाग करणार आहे. ‘मुल भेट शाळेवर थेट’ या उपक्रमावरही शिक्षण विभाग भर देत आहे. कमी गुणवत्ता आलेल्या शाळेतील शिक्षकांना गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी समज दिला जाणार आहे. यानंतरही गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सांगितले. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचन, लेखण, गणितातील मुलभूत क्रिया आल्या पाहिजेत, यासाठी शिक्षण विभाग धडपड करीत आहेत. शिक्षकाचे अध्यापन दर्जेदार व्हावे, शिकविताना कोणत्या अध्यापन पद्धती वापराव्यात, विद्यार्थी प्रगत कसे करावे, याबाबत दर महिन्याला शिक्षण परिषदा घेवून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यात आली. या चाचणीनंतर अध्ययनस्तर निश्चितीवर भर दिल्या जाणार आहे. आता सर्व शिक्षकांना अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करावे लागणार आहे.विद्यार्थी प्रगत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. कोणत्या घटकात विद्यार्थी अप्रगत आहे. हे पाहून विद्यार्थी दोन महिन्यांत प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दोन महिन्यात सर्व विद्यार्थी शंभर टक्के प्रगत करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.- राजेश पातळेउपशिक्षणाधिकारी हिंगोली

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा