शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मेगाभरतीसाठी जि.प.त १४७ रिक्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:33 AM

राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आकड्यांचे काही खरे दिसत नाही.शासनाने यापूर्वी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक आखून दिले होते. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल करू नये, असेही सांगितले होते. मात्र जागा भरण्यावर निर्बंध घातल्याने एक ते दोन जागांची भरती व्हायची. त्यासाठी येणाऱ्या हजारो अर्जांमुळे प्रशासनाची दमछाक व्हायची. आता राज्यात एकत्रित भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगितले जाते. यासाठी जिल्हा परिषदेने तर रिक्त पदांचा अहवालही दिला आहे. एकूण १८२ जागा रिक्त असल्या तरीही अनुकंपासाठी राखीव ठेवलेल्या ३१ जागा यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण १४७ जागा रिक्त राहात आहेत. यात आरोग्य सेवक महिला-९0, आरोग्य सेवक पुरूश-२७, ग्रामसेवक ६, पशुधन पर्यवेक्षक २, अंगणवाडी पर्यवेक्षिका-३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५, औषध निर्माण अधिकारी-४, कनिष्ठ अभियंता १0 अशा रिक्त जागा आहेत. याला पूर्णपणे मंजुरी मिळाली तर एवढ्या जागा निघण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात तर तलाठ्यांच्याच जास्त जागा असून एकूण २५ जागा रिक्त असल्याने ते भरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेगा भरतीत या दोन प्रमुख संस्थांमध्ये तांत्रिक पदे वगळता इतर पदांची संख्या नसल्यातच जमा आहे. त्यामुळे ही भरती केवळ तांत्रिक पदांसाठीच होणार की काय? असे चित्र दिसत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया होणे शक्य दिसत नसून तयारी करणाºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर सगळीकडेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मेगा भरतीच्या आशेने अनेकजण क्लासेसलाही जात आहेत. मात्र होणाºया भरतीत तांत्रिक पदांचीच संख्या जास्त असल्याचे हिंगोली जिल्ह्यात तरी दिसत आहे. त्यामुळे उर्वरित पदांसाठी मोठी चुरस राहणार आहे. त्यातच शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठीही अटींमध्ये शिथिलता प्रदान केली आहे. त्यात केवळ टीईटी उत्तीर्णतेचा प्रश्न राहणार आहे. मात्र सर्वच पदे राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेवून केंद्रिय पद्धतीने भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद