शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

मरण झाले स्वस्त ; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात रस्ते अपघाताने भर टाकली आहे. गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये २३३ अपघात घडले असून, यात १२५ जणांना प्राण गमवावे लागले.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराने दुसऱ्या लाटेत चांगलाच धूमाकूळ घातला होता. आता कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले, तरी कोरोनाने आतापर्यंत ३८२ रुग्णांचा जीव घेतला आहे, परंतु यापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होत आहेत. कोरोना काळात रस्ते अपघाताला थोडासा ब्रेक लागला. मात्र, आतापर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूचा आकडा सर्वांना चिंतेत टाकणारा आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, भरधाव वाहने चालविणे, वाहनाला धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे, यातून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यात रस्त्यांची दुरवस्थाही अपघातामध्ये भर टाकत आहे. रस्त्याची दुरवस्था असतानाही काही जण वेळेवर पोहोचण्यासाठी त्यावर भरधाव वाहने चालवितात. यातून अपघात घडतो. अपघातामध्ये दररोज मृत्यू होत असतानाही याचे काहीच वाटत नसल्याचे चित्र आहे.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य!

वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतात. माझाही अपघात झाला होता. या अपघातात पायात रॉड बसवावा लागला. अपघातातून बचावल्यानंतरच जीवन किती अमूल्य आहे ते कळते. त्यामुळे वाहने जपूनच चालवावी.

- गजानन कल्याणकर, बोरी शिकारी

वेळ ही महत्त्वाची आहे. वेळ सर्वांनीच पाळावी. मात्र, त्यापेक्षाही जीवन खूप महत्त्वाचे आहे. जीव सुरक्षित असेल, तर गमावलेली वस्तू पुन्हा मिळविता येते. वाहन चालविताना सर्वांनीच खबरदारी घ्यावी. माझाही अपघात झाला होता. यातून बचावलो.

- भगवान राऊत, साळवा

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते, तसेच या वर्षीही कडक निर्बंध घालण्यात आल्याने बहुतांश दिवस वाहने लॉक झाली होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने अपघाताला वाव मिळाला नाही. २०१९ मध्ये जिल्ह्यात २८९ अपघात घडले होते. यात १२३ जणांना जीव गमवावा लागला, तर २०२० मध्ये लॉकडाऊन काळात २३३ अपघातांच्या घटना घडल्या, तर १२५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्येही अपघाताच्या घटनेत घट झाली आहे.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

भरधाव वाहने चालवून, वाहनावरील नियंत्रण सुटून जशा अपघाताच्या घटना घडल्या. तशाच पायी जाणाऱ्या व्यक्तींनाही जीव गमवावा लागला. दुसऱ्यांच्या चुकीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्तींला नाहक अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

गंभीर दुखापत झालेल्यांची संख्याही अधिक

जिल्ह्यात २०१९ मध्ये २८९ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १२३ जणांचा मृत्यू झाला असून, २२६ जण गंभीर तर १०० जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर २०२० मध्ये २३३ अपघात घडले. यात १२५ जणांचा मृत्यू झाला असून, १९५ जण गंभीर तर ३० जणांना किरकोळ मार लागला.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

जिल्ह्यात १५ ब्लॅक स्पॉट आहेत. यात नांदेड नाका, रिसाला नाका, मसोड फाटा, पार्डीमोड फाटा, सावरखेडा ब्रीज फाटा, माळहिवरा पाटी, कलगाव वळण, अकोला बायपास, औंढा नागनाथ बसथांबा, गोळेगाव धाबा, धार पाटी, डोंगरकडा, वारंगा फाटा, कामठा फाटा, कौठा पाटी आदी ठिकाणांचा समावेश आहे. वाहन चालकांनी या ठिकाणी वाहने सावकाश चालवावीत.

वर्षे अपघात जखमी मृत्यू

२०१८ ३१३ ४४४ १३१

२०१९ २८९ ३२६ १२३

२०२० २३३ २२५ १२५