शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

मरण झाले स्वस्त ; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात रस्ते अपघाताने भर टाकली आहे. गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये २३३ अपघात घडले असून, यात १२५ जणांना प्राण गमवावे लागले.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराने दुसऱ्या लाटेत चांगलाच धूमाकूळ घातला होता. आता कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले, तरी कोरोनाने आतापर्यंत ३८२ रुग्णांचा जीव घेतला आहे, परंतु यापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होत आहेत. कोरोना काळात रस्ते अपघाताला थोडासा ब्रेक लागला. मात्र, आतापर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूचा आकडा सर्वांना चिंतेत टाकणारा आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, भरधाव वाहने चालविणे, वाहनाला धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे, यातून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यात रस्त्यांची दुरवस्थाही अपघातामध्ये भर टाकत आहे. रस्त्याची दुरवस्था असतानाही काही जण वेळेवर पोहोचण्यासाठी त्यावर भरधाव वाहने चालवितात. यातून अपघात घडतो. अपघातामध्ये दररोज मृत्यू होत असतानाही याचे काहीच वाटत नसल्याचे चित्र आहे.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य!

वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतात. माझाही अपघात झाला होता. या अपघातात पायात रॉड बसवावा लागला. अपघातातून बचावल्यानंतरच जीवन किती अमूल्य आहे ते कळते. त्यामुळे वाहने जपूनच चालवावी.

- गजानन कल्याणकर, बोरी शिकारी

वेळ ही महत्त्वाची आहे. वेळ सर्वांनीच पाळावी. मात्र, त्यापेक्षाही जीवन खूप महत्त्वाचे आहे. जीव सुरक्षित असेल, तर गमावलेली वस्तू पुन्हा मिळविता येते. वाहन चालविताना सर्वांनीच खबरदारी घ्यावी. माझाही अपघात झाला होता. यातून बचावलो.

- भगवान राऊत, साळवा

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते, तसेच या वर्षीही कडक निर्बंध घालण्यात आल्याने बहुतांश दिवस वाहने लॉक झाली होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने अपघाताला वाव मिळाला नाही. २०१९ मध्ये जिल्ह्यात २८९ अपघात घडले होते. यात १२३ जणांना जीव गमवावा लागला, तर २०२० मध्ये लॉकडाऊन काळात २३३ अपघातांच्या घटना घडल्या, तर १२५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्येही अपघाताच्या घटनेत घट झाली आहे.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

भरधाव वाहने चालवून, वाहनावरील नियंत्रण सुटून जशा अपघाताच्या घटना घडल्या. तशाच पायी जाणाऱ्या व्यक्तींनाही जीव गमवावा लागला. दुसऱ्यांच्या चुकीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्तींला नाहक अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

गंभीर दुखापत झालेल्यांची संख्याही अधिक

जिल्ह्यात २०१९ मध्ये २८९ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १२३ जणांचा मृत्यू झाला असून, २२६ जण गंभीर तर १०० जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर २०२० मध्ये २३३ अपघात घडले. यात १२५ जणांचा मृत्यू झाला असून, १९५ जण गंभीर तर ३० जणांना किरकोळ मार लागला.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

जिल्ह्यात १५ ब्लॅक स्पॉट आहेत. यात नांदेड नाका, रिसाला नाका, मसोड फाटा, पार्डीमोड फाटा, सावरखेडा ब्रीज फाटा, माळहिवरा पाटी, कलगाव वळण, अकोला बायपास, औंढा नागनाथ बसथांबा, गोळेगाव धाबा, धार पाटी, डोंगरकडा, वारंगा फाटा, कामठा फाटा, कौठा पाटी आदी ठिकाणांचा समावेश आहे. वाहन चालकांनी या ठिकाणी वाहने सावकाश चालवावीत.

वर्षे अपघात जखमी मृत्यू

२०१८ ३१३ ४४४ १३१

२०१९ २८९ ३२६ १२३

२०२० २३३ २२५ १२५