मागणी केली ९० हजार ५२ टनाची; मिळाले ७३ हजार १०५ टन खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:53+5:302021-07-07T04:36:53+5:30
जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० ...

मागणी केली ९० हजार ५२ टनाची; मिळाले ७३ हजार १०५ टन खत
जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० हजार १३७.१९ टन रासायनिक खत शिल्लक होते. अशा प्रकारे एकूण ८४,५६९.८९ मेट्रिक टन खरीप हंगामासाठी खतसाठा उपलब्ध झाला. यापैकी ५३ हजार ८६३.८ टन रासायनिक खताची विक्री झाली आहे. आजमितीस ३० हजार ७०६.११ टन खत शिल्लक राहिले आहे.
जिल्ह्यातील खताची गरज लक्षात घेता पुरेशा प्रमाणात खतसाठा जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. युरिया, डीएपी खताची गरज लक्षात घेता कृषी आयुक्तालयाकडे व जिल्हास्तरावर रासायनिक खताचे नियोजन करण्यात येत आहे.
- नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली
जूनअखेर मिळालेले रासायनिक खत (टनामध्ये)
युरिया ८३४३
डीएपी ८३२८
एमओपी २७०८
एसएसपी ६०३९
एनपीके ११६२०
३१ मार्चअखेर शिल्लक खत
युरिया ७५१६.६९
डीएपी २९१९.५
एमओपी १४७२.४५
एसएसपी ६८०९.४
एनपीके ११,४१९.१५
आतापर्यंत विक्री झालेला
युरिया ११,७०७.५
डीएपी ६५०१.४७५
एमओपी ३३५३.७५
एसएसपी ९७८१.८७५
एनपीके २२,५१९.१९
आजमितीस शिल्लक रासायनिक खत
एकूण ८४,५६९.८९
विक्री ५३,८६३.८
शिल्लक ३०,७०६.११