शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

डिसेंबर महिन्यात हिंगोलीत मालमत्ता खरेदी-विक्रीचे झाले १ हजार १६४ व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

कोरोनामुळे काही काळ खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे शासनाच्या मोठ्या महसुलावर पाणी फेरले गेले होते. यात सुधारणा होण्यासाठी ...

कोरोनामुळे काही काळ खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे शासनाच्या मोठ्या महसुलावर पाणी फेरले गेले होते. यात सुधारणा होण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात मोठी सूट दिली. सात टक्क्यांवरून चार टक्क्यांवर मुद्रांक शुल्क आणले. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्येही वाढ झाली. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मागील चर महिन्यांत या आदेशाचा परिणाम स्पष्टपाणे दिसत होता. त्यात प्रतिमहिना ५०० पेक्षा जास्त व्यवहार झाले. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात हे चित्र होते. डिसेंबरमध्ये तर यात विक्रमच झाला. तब्बल १,१६४ दस्तांची नोंदणी झाली. त्यामुळे मागील आठ महिन्यांत जेवढी नोंदणी झाली नाही, त्यापेक्षा जास्त या चार महिन्यांत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कार्यालयातही तुफान गर्दी होत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेल्याने अनेकांकडे आलेली रक्कम ते मालमत्तांमध्ये गुंतवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हिंगोलीत ८.९३ कोटींचा महसूल मिळाला

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोलीसह तालुक्यात विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे मागील चार महिन्यांत शासनाने मालमत्तांच्या व्यवहारासाठी मोठी मुद्रांक सूट देऊनही सव्वातीन कोटींचा महसूल मिळाला आहे.

एकट्या डिसेंबर महिन्यात १.४१ कोटी मिळाले असून, यापूर्वी नेहमीच जास्त व्यवहार असणाऱ्या जून महिन्यात १.१७ कोटींचा महसूल मिळाला होता. त्यावेळी सूट नसल्याने अवघ्या ४८७ व्यवहारांवर हा महसूल मिळाला.

ऑगस्टमध्ये महसूल घटताच हा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याने एकूण महसूल ८.९३ कोटींचा मिळाला आहे.

कोरोनाचे नियम पाळले गेले का?

दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर आता बीएसएनएलच्या जुन्या कार्यालयात झाले आहे. या ठिकाणी आधीच अडचणीची जागा आहे. त्यातच कनेक्टिव्हिटी व इतर कारणांनी दस्त नोंदणीला विलंब होते. त्यातच दलालांचीही घिसाडघाई असते. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही कुणी कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याचे चित्र दिसत होते.

सूट असल्याने वाढले व्यवहार

कोरोनामुळे यंदा काही काळ खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नव्हते. मात्र शासनाने सवलत जाहीर केल्यानंतर या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात जवळपास ९ कोटींचा महसूल मिळाला आहे. ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्यांची नोंदणी अजूनही केली जात आहे.

आर.पी. गायकवाड

दुय्यम निबंधक हिंगोली