शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक

By विजय पाटील | Updated: November 22, 2023 13:23 IST

वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारातील घटना

हिंगोली: वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात बुधवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचा ५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु आग आटोक्यात आली नसल्यामुळे ऊस पूर्णत: जळून खाक झाला. ऐन रबी हंगामात ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:२० वाजेदरम्यान शॉर्टसर्किटमुळे कुलदीप टाक यांच्या ५ एकरांमधील ऊसाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही माहिती कळताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी अग्नीशामक विभागाला फोन करुन अग्नीशामक गाडी बोलावून घेतली. परंतु तोपर्यंत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. 

खरीप हंगामातील पिकांना म्हणावा तसा भाव मिळत नाही म्हणून शेतकरी अगोदरच चिंतेत आहेत. त्यात उसाला लागलेली आग हे मोठे संकट शेतकऱ्यापुढे उभे ठाकले आहे. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शेजारच्या शेतकऱ्यांनी केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे पाच एकरातील ऊस पूर्णत: जळून गेला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfireआगHingoliहिंगोली