शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

coronavirus : जनता कर्फ्यूला हिंगोलीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:11 IST

जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी पाळत प्रत्येकांनी आपल्या घरात राहणेच पसंत केले. 

हिंगोली :  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यूमध्ये हिंगोलींकर सहभागी झाले असून जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी पाळत प्रत्येकांनी आपल्या घरात राहणेच पसंत केले. 

हिंगोली शहरातील मुख्य चौकाचौकात शुकशुकाट दिसून आला. यामध्ये श्री अग्रसेन महाराज चौक, बसस्थानक,  महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच शहरातील इतर मुख्य रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १० वाजेपर्यंत देशभरातील पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हिंगोली येथील रेल्वेस्थानक परिसरात शुकशुकाट होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून २१ व २२ मार्च रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसारच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यू आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नागरिक सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत या कालावधीत घराबाहेर न पडता स्वत:हून संचारबंदी पाळून कोरोना विषाणू विरुध्द लढा देत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली