शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

CoronaVirus : हिंगोलीत प्रशासनाची निष्काळजी भोवली; आणखी एक एसआरपीएफ जवान पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 22:05 IST

रुग्णांची संख्या 47 इतकी झाली असून एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या 47 रुग्णात 42 जण एसआरपी जवान आहेत.

ठळक मुद्देआज एकाच दिवसात हिंगोलीत 26 रुग्ण वाढले आहेतआरोग्य यंत्रणेकडून तपासणी नाही

हिंगोली,:- हिंगोलीमध्ये  1 मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज एकाच दिवसात हिंगोलीत 26 रुग्ण वाढले आहेत.  

मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्तावरून 19 व 20 एप्रिल रोजी हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी जिल्ह्यात परत आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 25 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित झाले असून सायंकाळी आणखी एक जवान कोरोनाग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची संख्या 47 इतकी झाली असून एका रुग्णाने  कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या 47 रुग्णात 42 जण एसआरपी जवान आहेत.  तर एक  जालना येथील एसआरपी जवान  असून त्याच्या संपर्कातील दोघे  तर  वसमत व सेनगाव चा प्रत्येकी एक जण आहे. तर हिंगोलीच्या चार जवानांना मधुमेह, उच्चरक्तदाब आदी त्रास असल्याने औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

प्रशासनाची निष्काळजी भोवली

या सर्व प्रकारात जिल्हा प्रशासन व एसआरपी प्रशासनाने कोरंटाईन केलेल्या जवानांना सुरुवातीला एका खोलीत तीन ते चार जण ठेवल्याने गोंधळ झाला. त्यामुळे बाधित व बाधित नसलेले एकत्र राहिले. आताही या रुग्णांना स्वतंत्र खोली दिल्याचे सांगितले जात आहे त्यांना शौचालय व इतर सुविधा मात्र एकत्रितपणे वापरायला लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अजून रुग्ण वाढण्याची भीती जवानांमधूनच व्यक्त केली जात आहे. याशिवाय या जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही सुमार असल्याचे सांगितले जात आहे प्रशासन या जवानांना वाळीत टाकल्या प्रमाणे वागवत असल्याने संतापाची लाट आहे. हे जवान रेड झोन मध्ये कर्तव्य म्हणून सेवा बजावण्यासाठी गेले होते, मात्र आता त्यांच्याकडे अपराध्यासारखे पाहिले जात आहे.

आरोग्य यंत्रणेकडून तपासणी नाहीआरोग्य यंत्रणा या जवानांना सूचना देण्यासाठी कधीच  कोरंटाईन सेंटरमध्ये जात नाही. इतरही ठिकाणी असाच उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. शिवाय किती रुग्ण पॉझिटिव्ह आहेत याची माहिती नावासह बाहेर येण्याची  प्रकारही अजून सुरूच आहेत. प्रशासन याबाबत कधी गंभीर होईल, हे कळायला मार्ग नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली