शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. कोरोनाकाळात २४ जणांनी मृत्यूपत्र तयार केल्याची नोंद हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. आतापर्यंत १५ हजार ६८० रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंत ३६१ रुग्णांना मृत्यूने गाठले असून, यात कमावत्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कमावत्या व्यक्तींसमोर भीती निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान अकाली मृत्यू आल्यास कुटुंबात संपत्तीवरून वाद नको, म्हणून अनेक जण मृत्युपत्र तयार करीत आहेत. न्यायालय परिसरात तीन ते चार नोटरी वकील आहेत. या वकिलांकडे मृत्युपत्र तयार करण्यासाठी एकानेही संपर्क साधला नसला तरी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे मात्र मागील वर्षी १८ तर चालू वर्षी ६ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले, हे सांगता येणार नसल्याचे रजिस्ट्री कार्यालयातूून सांगण्यात आले.

दीड वर्षात अशी झाली नोंदणी

२०२० मध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिना सोडला तर मार्च ते जून महिन्यापर्यंत एकाही मृत्यूपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही. त्यानंतर जुलै २, ऑगस्ट १, सप्टेंबर १, ऑक्टोबर ६, नोव्हेंबर १, डिसेंबर महिन्यात एकाने मृत्युपत्र करून घेतले आहे. २०२१ मध्ये जानेवारी १, फेब्रुवारी ३ तर मार्च महिन्यात २ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यात एकाही मृत्युपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकाली मृत्यू येत असल्याने मृत्युपत्र करण्याकडे साहजिकच कल वाढत आहे. आपल्यानंतर कुटुंबात वाद नको म्हणून मृत्युपत्र करण्याचा निर्णय घेत असावेत.

- ॲड. शेषराव पतंगे, जिल्हाध्यक्ष, वकील संघ

कोरोनाची प्रत्येकाने धास्ती घेतली आहे. आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात असले तरी अकाली मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे. येथील नोटरी वकिलाकडे मृत्युपत्र करण्यासंदर्भात विचारणा होत नसली तरी सह दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र मृत्युपत्र करून घेत आहेत.

-ॲड. जे.पी. खंदारे,

असे आहेत मृत्युपत्र करण्याचे प्रकार

घर, शेती तसेच अन्य संपती कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यासाठी त्याची काही जण वकिलामार्फत नोटरी करतात. तर काही जण साध्या कागदावरही त्याची नोंद करून ठेवतात, तसेच रजिस्टर्ड नोटरी केल्यास त्याचे शुल्क भरून शासन दरबारी त्या मृत्युपत्राची नोंद राहते.