शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. कोरोनाकाळात २४ जणांनी मृत्यूपत्र तयार केल्याची नोंद हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. आतापर्यंत १५ हजार ६८० रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंत ३६१ रुग्णांना मृत्यूने गाठले असून, यात कमावत्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कमावत्या व्यक्तींसमोर भीती निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान अकाली मृत्यू आल्यास कुटुंबात संपत्तीवरून वाद नको, म्हणून अनेक जण मृत्युपत्र तयार करीत आहेत. न्यायालय परिसरात तीन ते चार नोटरी वकील आहेत. या वकिलांकडे मृत्युपत्र तयार करण्यासाठी एकानेही संपर्क साधला नसला तरी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे मात्र मागील वर्षी १८ तर चालू वर्षी ६ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले, हे सांगता येणार नसल्याचे रजिस्ट्री कार्यालयातूून सांगण्यात आले.

दीड वर्षात अशी झाली नोंदणी

२०२० मध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिना सोडला तर मार्च ते जून महिन्यापर्यंत एकाही मृत्यूपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही. त्यानंतर जुलै २, ऑगस्ट १, सप्टेंबर १, ऑक्टोबर ६, नोव्हेंबर १, डिसेंबर महिन्यात एकाने मृत्युपत्र करून घेतले आहे. २०२१ मध्ये जानेवारी १, फेब्रुवारी ३ तर मार्च महिन्यात २ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यात एकाही मृत्युपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकाली मृत्यू येत असल्याने मृत्युपत्र करण्याकडे साहजिकच कल वाढत आहे. आपल्यानंतर कुटुंबात वाद नको म्हणून मृत्युपत्र करण्याचा निर्णय घेत असावेत.

- ॲड. शेषराव पतंगे, जिल्हाध्यक्ष, वकील संघ

कोरोनाची प्रत्येकाने धास्ती घेतली आहे. आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात असले तरी अकाली मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे. येथील नोटरी वकिलाकडे मृत्युपत्र करण्यासंदर्भात विचारणा होत नसली तरी सह दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र मृत्युपत्र करून घेत आहेत.

-ॲड. जे.पी. खंदारे,

असे आहेत मृत्युपत्र करण्याचे प्रकार

घर, शेती तसेच अन्य संपती कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यासाठी त्याची काही जण वकिलामार्फत नोटरी करतात. तर काही जण साध्या कागदावरही त्याची नोंद करून ठेवतात, तसेच रजिस्टर्ड नोटरी केल्यास त्याचे शुल्क भरून शासन दरबारी त्या मृत्युपत्राची नोंद राहते.