सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:26+5:302021-03-19T04:28:26+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. १८ मार्च रोजी नव्याने ८७ रुग्ण आढळले असून ७० जण ...

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दाेघांचा मृत्यू
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. १८ मार्च रोजी नव्याने ८७ रुग्ण आढळले असून ७० जण बरे झाले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने वसमत तालुक्यातील दाेघांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात अँटीजन चाचणीत आज ३१ रुग्ण आढळून आले आहेत. हिंगोलीत ७२ पैकी ९ रुग्ण आढळले. यात न.प.कॉलनी १, श्रीनगर १, सामान्य रुग्णालय २, हिंगोली १, जंतूर १, एनटीसी १, नेहरूनगर १ यांचा समावेश आहे. कळमनुरीत ११६ पैकी १९ बाधित आढळले. यात परभणी १, कळमनुरी २, नागपूर २, हातमाली १, हिंगोली २, हदगाव २, नांदेड २, आखाडा बाळापूर १, कळमनुरी ४, शेनोडी १ यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यात ६३ पैकी ३ बाधित आढळले. यात कापडसिंगी, शेनोडी व सेनगाव येथील प्रत्येकी एक आहे. वसमतला ५८ तर औंढ्यात १३ पैकी एकही बाधित नाही.
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २८ बाधित आढळले. यात शस्त्रीनगर १, कोमटी गल्ली १, गोविंदनगर १, रिसाला बाजार २, आदर्श कॉलेजजवळ २, एनटीसी ६, जुने पोलीस ठाणे १, आनंदवाडी १, हिलटॉप कॉलनी २, रेल्वे क्वार्टर १, टाले हॉलजवळ २, संत नामदेवनगर २, लाख १, बाभूळगाव १, हिंगोली १ यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगावात ३, वसमत तालुक्यातील अकोलीत ७, औंढा तालुक्यातील रामेश्वर ७ व वगरवाडी १, कळमनुरी येथील ७ तर हदगावचे ३ असे एकूण ५६ रुग्ण आढळून आले आहेत.
बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये हिंगोली सामान्य रुग्णालयातून २८, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधून १४, कळमनुरीतून २२ तर औंढा येथून ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल असलेल्या वसमत तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. यात पांगरा येथील ६० वर्षीय पुरुष तर लिंगपिंपरी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ५०६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४५३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर सध्या ४५३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर ८ जणांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे.
वाढते मृत्यू चिंताजनक
मागील पंधरा दिवसांच्या काळात जवळपास दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे. १ मार्च रोजी मृत्यूचा आकडा ६० होता. आज तो ७१ वर गेला आहे.