शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कोरोनामुळे हिरावले ४० बालकांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने ...

हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने आई आणि वडील दोघेही गमावले असून, या बालकांच्या योग्य बालसंगोपनासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, ॲड. वैशाली देशमुख, सरस्वती कोरडे आणि बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे यांनी जिल्ह्यात पालकत्व गमावलेल्या ४० बालकांचा शोध घेतल्याचे सांगितले. ही सर्व बालके आपले काका-काकू, मामा-मामी आणि आजी-आजोबांकडे सध्या वास्तव्यास आहेत. भविष्यात या बालकांचे नातेवाईक आपल्या जवळ ठेवण्यास तयार नसल्यास त्यांना बालसंगोपनगृहात ठेवून त्यांचे संगोपन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

यावेळी जयवंशी म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी आपले पालकत्व गमावले आहे. यात एक किंवा दोन्ही पालक गमावलेले, तसेच ज्या बालकांनी कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे आपले पालकत्व गमावले असेल त्यांचीही माहिती संकलित करावी, तसेच सदर माहिती दैनंदिन पोर्टलवर अद्ययावत करावी. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील त्यांचे बालसंगोपन योजनेतून संगोपन करावे.

एकच पालक बाधित असल्यास मुलांना सांभाळा

ज्या बालकांचे एकच पालक आहे आणि ते विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत, अशांची माहिती दररोज जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, तसेच या कालावधीसाठी त्यांचे संगोपन करावे. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांना पोलीस विभागाने संरक्षण उपलब्ध करून द्यावे. त्यांचे शोषण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या हेल्‍पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहनही जयवंशी यांनी केले.