शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

शाळा सुरू करण्यासाठी आता समिती घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

राज्यात १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ...

राज्यात १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्च करून ठराव घ्यायचा आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. यात तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सदस्य, तर ग्रामसेवक सचिव राहणार आहेत.

याशिवाय जुने बरेच नियम कायम ठेवले. ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबविण्यास सांगितले. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा, तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी यांची व्यवस्था करण्यासही सांगितले. शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीला पडताळणी करण्यास सांगितले. सामाजिक अंतर, बाकांतील अंतर, मास्कचा वापर, रांगेत सहा फुटांचे अंतर, गर्दीचे कार्यक्रम न घेणे अशा सूचना कायम आहेत, तर पालकांची संमती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मात्र उपस्थितीचे बंधन नाही. ती पालकांवर अवलंबून आहे.

या बाबींवर करावा विचार

शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्याचे नियोजन प्राधान्याने जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, याबाबत मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नये, विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे, वैद्यकीय उपचार सुरू करावेत, शाळेत टप्प्याटप्प्याने मुलांना बोलवावे, या बाबींवर विचार करण्यास सांगण्यात आले आहे.