शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

स्वच्छतेतून हिंगोली पालिका सुंदरतेकडेे; सलग पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम ...

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम विभागात ३८ तर २०१९ मध्ये ३३ वा क्रमांक आला. यात ७.५ कोटींची बक्षिसे मिळाली. त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद या उपक्रमात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या नगरपालिकांमध्ये हिंगोली पालिका देशात प्रथम आली होती. त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या घरकूल उभारणीसाठी तीन लाभार्थ्यांचा देशपातळीवर गौरव झाला होता. पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हे सहकाऱ्यांना घेऊन राबवत असलेल्या विविध उपक्रमांना साथ दिल्याने पालिका माझी वसुंधरा उपक्रमातही राज्यात पहिली आली आहे.

कसे मिळाले यश?

माझी वसुंधरा अभियानात राज्यात पहिला येण्याचा मान मिळालेल्या हिंगोली पालिकेला एवढे मोठे यश मिळेल, याचा अंदाज नव्हता. हिंगोली पालिकेने पृथ्वी, जल, वायू, आकाश आदी पाच घटकांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार मिळाला. यात मागील काही वर्षांपासून काम सुरू होते. केलेल्या कामाचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. त्यातून निवड झाली.

नेमके काय केले?

हिंगोली पालिकेने वृक्षलागवडीवर भर दिला. शहरात पंधरा हजार रोपे गतवर्षी लावली, तर १५ हजार रोपट्यांची स्वत:ची नर्सरी उभी केली. यंदा २२ हजार वृक्षलागवड करण्यात येत आहेत.

नगरपालिकेने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून गटाराचे पाणी थेट नदीत जाण्याचा प्रकार बंद केला. मलनिस्सारण प्रकल्प उभारून त्याद्वारे शुद्ध पाणी पात्रात सोडणार आहेत.

शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी नवीन बांधकामांसह जुन्यांनाही प्राेत्साहन दिले. त्यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्ययावत केली. तेथे ओला कचरा वेगळा करून गांडूळ व सेंद्रिय खतनिर्मिती, टाकाऊ अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी कचरा वेगळा करण्यात येत आहे.

त्याचबरोबर कचरासाठा बंद केल्याने वायुप्रदूषण घटले असून वृक्षलागवडीनेही याला हातभार लावला आहे.

माझी वसुंधरा अभियानासाठी पदाधिकाऱ्यांसह पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद झाला. मागील काही वर्षांत पालिकेला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे नागरिकांचेही सहकार्य चांगले मिळत आहे.

- बाबाराव बांगर, नगराध्यक्ष

माझी वसुंधरा अभियानातील पुरस्कार हा हिंगोली पालिकेच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे. न.प.चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने हे यश मिळाले. शहरवासीयांचे यासाठी अभिनंदन.

- दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष

पदाधिकाऱ्यांच्या साथीने न.प.तील माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, प्रशासनातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विविध कामांसाठी मिळालेली मदत उपयोगी ठरली. नागरिकांनीही सहकार्य केले. आपले शहर, हरित व सुंदर बनविण्यासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे.

डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी