शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेतून हिंगोली पालिका सुंदरतेकडेे; सलग पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम ...

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम विभागात ३८ तर २०१९ मध्ये ३३ वा क्रमांक आला. यात ७.५ कोटींची बक्षिसे मिळाली. त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद या उपक्रमात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या नगरपालिकांमध्ये हिंगोली पालिका देशात प्रथम आली होती. त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या घरकूल उभारणीसाठी तीन लाभार्थ्यांचा देशपातळीवर गौरव झाला होता. पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हे सहकाऱ्यांना घेऊन राबवत असलेल्या विविध उपक्रमांना साथ दिल्याने पालिका माझी वसुंधरा उपक्रमातही राज्यात पहिली आली आहे.

कसे मिळाले यश?

माझी वसुंधरा अभियानात राज्यात पहिला येण्याचा मान मिळालेल्या हिंगोली पालिकेला एवढे मोठे यश मिळेल, याचा अंदाज नव्हता. हिंगोली पालिकेने पृथ्वी, जल, वायू, आकाश आदी पाच घटकांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार मिळाला. यात मागील काही वर्षांपासून काम सुरू होते. केलेल्या कामाचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. त्यातून निवड झाली.

नेमके काय केले?

हिंगोली पालिकेने वृक्षलागवडीवर भर दिला. शहरात पंधरा हजार रोपे गतवर्षी लावली, तर १५ हजार रोपट्यांची स्वत:ची नर्सरी उभी केली. यंदा २२ हजार वृक्षलागवड करण्यात येत आहेत.

नगरपालिकेने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून गटाराचे पाणी थेट नदीत जाण्याचा प्रकार बंद केला. मलनिस्सारण प्रकल्प उभारून त्याद्वारे शुद्ध पाणी पात्रात सोडणार आहेत.

शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी नवीन बांधकामांसह जुन्यांनाही प्राेत्साहन दिले. त्यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्ययावत केली. तेथे ओला कचरा वेगळा करून गांडूळ व सेंद्रिय खतनिर्मिती, टाकाऊ अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी कचरा वेगळा करण्यात येत आहे.

त्याचबरोबर कचरासाठा बंद केल्याने वायुप्रदूषण घटले असून वृक्षलागवडीनेही याला हातभार लावला आहे.

माझी वसुंधरा अभियानासाठी पदाधिकाऱ्यांसह पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद झाला. मागील काही वर्षांत पालिकेला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे नागरिकांचेही सहकार्य चांगले मिळत आहे.

- बाबाराव बांगर, नगराध्यक्ष

माझी वसुंधरा अभियानातील पुरस्कार हा हिंगोली पालिकेच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे. न.प.चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने हे यश मिळाले. शहरवासीयांचे यासाठी अभिनंदन.

- दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष

पदाधिकाऱ्यांच्या साथीने न.प.तील माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, प्रशासनातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विविध कामांसाठी मिळालेली मदत उपयोगी ठरली. नागरिकांनीही सहकार्य केले. आपले शहर, हरित व सुंदर बनविण्यासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे.

डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी