शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला ‘बाल विवाह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:31 IST

बालविवाह थांबविण्याबाबत कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला.

हिंगोली : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १४ वर्षीय मुलीचा विवाह २६ मे, २०२०  रोजी नियोजित होता. २५ मे रोजी बाल विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांना प्राप्त होताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार बाल विवाह रोखण्यात आला.

मुलीचे आई-वडील आणि चुलता यांना बाल विवाह कायदा २००६ नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच बाल विवाह केल्यामुळे मुला-मुलीवर होणारे दुष्परिणाम शारिरीक व मानसिक घटकांवर होणारे दूरगामी परिणाम तसेच कायद्याचा भंग केल्यास योग्य ती कारवाई होवू शकते अशी समज दिली. त्यानंतर मुलीच्या कुटूंबातील सदस्य बालविवाह थांबविण्यास तयार झाले. बालविवाह थांबविण्याबाबत कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला. सदर बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन हिंगोलीचे टिम सदस्य तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य केले. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmarriageलग्नPoliceपोलिस