शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

केंद्रीय पथकाची हिंगोलीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:25 IST

जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात केवळ आॅगस्ट महिन्यात सतत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची टक्केवारी थोडीबहुत जागेवर आली. मात्र हा पाऊस पिकांना केवळ जिवंत करणारा ठरला होता. त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यामुळे जिल्हाभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन मोक्याच्या क्षणी पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापूस, तूर, हळद आदी पिके तर वाळून जात आहेत. रबीचा हंगामही येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ज्या भागात कॅनॉलला पाणी सुटले, अशा भागातच पेरणीचा टक्का जास्त दिसून येत आहे. तर काहींनी घाईगडबडीत रबीची पेरणी आटोपली. मात्र आता हा हरभरा, करडई वाळत आहे. त्यामुळे या पेरणीचाही काही फायदा नाही. अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जलसाठे झपाट्याने रिकामे होत आहेत. आगामी काळात शेतकºयांना गुरांच्या चारा व पाण्यासाठी मोठी मरमर करावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाड्याच्या दौºयावर असलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने तीव्र दुष्काळी जिल्‘ांतच भेटी दिल्या. त्यातून हिंगोलीला वगळले आहे. तीन तालुके आधीच दुष्काळात असल्याने उर्वरित दोन तालुक्यांना पाहणी पथकाच्या दौºयानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आता तीही धुसर बनली आहे. या पथकाच्या इतर जिल्‘ांतील दौºयातील पाहणीवरूनच हिंगोलीतील दुष्काळ जाहीर झालेल्या भागाबाबत निर्णय होईल, असे दिसते.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ