शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

आमचे रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या! हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:48 IST

Hingoli News: सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत.

गोरेगाव (जि. हिंगोली) :  सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत. आता कुटुंब उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित शेतकऱ्यांनी ‘आमचे रक्त विकत घ्या  आणि बदल्यात पोट भरण्यासाठी गहू, तांदूळ, तेल अन्नधान्य द्या,’ अशी मागणी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे  सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रचंड पीकहानी होऊनही  पीक विम्याचा एक रुपयाचाही परतावा मिळाला नाही. कुठलीच शासकीय  मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारकडे रक्त काढून घ्या, पण अन्नधान्य द्या, अशी मागणी  केली आहे.

वारंवार आंदोलने करूनही  शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर   अवयव, रक्त विक्रीची वेळ आली आहे.  - गजानन कावरखे,     शेतकरी, गोरेगाव, जि. हिंगोली

  परिणामी शेतकरी कंगाल झाला असल्याने आता परिवाराचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हा मुद्दा मांडत गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून आता रक्त विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली