शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 14:53 IST

शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेवाळा येथील दोन बालके खेळताना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. दिवसभर शोधूनही ते सापडले नाहीत. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेवाळा येथील कयाधू नदीच्या पात्रात त्या दोघांचे मृतदेह सापडले. चिमुकल्यांचे मृतदेह सापडताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील साधारणतः तीन ते साडेतीन वर्षे वयाची दोन बालके २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची खबर मिळाली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोघेजण सकाळी गावातील मंदिराच्या शेजारी नेहमीप्रमाणे खेळत होते. परंतु सकाळी ११ वाजल्यानंतर ते दोघे दिसेनासे झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ते सापडत नव्हते.

सर्व नातेवाइक, गावातील सर्व जागा, शेताकडे असा सर्वत्र शोध घेतला. पण सापडत नसल्याने सोशल मीडियावर दोन बालके हरवली असल्याचे संदेश सर्वत्र टाकण्यात आले. दिवसभर सर्वत्र शोध घेण्यात आला. कयाधू नदीपात्रातही शोध घेतला. परंतु ते काही सापडले नाहीत. शेवाळा येथील मंदिराजवळील पायऱ्यानंतर एका ठिकाणी पाय घसरल्याची ओळखण आढळली. तिथेही दिवसा शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. अखेर सायंकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्या ओळखणीजवळ माणसांना खाली सोडण्यात आले. त्यावेळी दोघेही भाऊ हातात हात घेऊनच तिथे मृतावस्थेत आढळल्याने एकच धक्का बसला. मृतदेह पाहताच नातेवाइकांनी टाहो फोडला.

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हातदोघे चुलत भाऊ. दोघांची नेहमीची गट्टी. एकत्रितच खेळायचे. आज दोघेही एकाच वेळी खेळताना गायब झाले. स्वराज आणि शिवराज यांची दोस्ती पक्की होती. दिवसभराच्या शोधानंतर कयाधू नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हाही दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेले होते. अखेरच्या क्षणीही भावाचा हात सोडला नाही. हे दृश्य पाहून उपस्थित गहिवरून गेले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू