शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 14:53 IST

शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेवाळा येथील दोन बालके खेळताना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. दिवसभर शोधूनही ते सापडले नाहीत. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेवाळा येथील कयाधू नदीच्या पात्रात त्या दोघांचे मृतदेह सापडले. चिमुकल्यांचे मृतदेह सापडताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील साधारणतः तीन ते साडेतीन वर्षे वयाची दोन बालके २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची खबर मिळाली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोघेजण सकाळी गावातील मंदिराच्या शेजारी नेहमीप्रमाणे खेळत होते. परंतु सकाळी ११ वाजल्यानंतर ते दोघे दिसेनासे झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ते सापडत नव्हते.

सर्व नातेवाइक, गावातील सर्व जागा, शेताकडे असा सर्वत्र शोध घेतला. पण सापडत नसल्याने सोशल मीडियावर दोन बालके हरवली असल्याचे संदेश सर्वत्र टाकण्यात आले. दिवसभर सर्वत्र शोध घेण्यात आला. कयाधू नदीपात्रातही शोध घेतला. परंतु ते काही सापडले नाहीत. शेवाळा येथील मंदिराजवळील पायऱ्यानंतर एका ठिकाणी पाय घसरल्याची ओळखण आढळली. तिथेही दिवसा शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. अखेर सायंकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्या ओळखणीजवळ माणसांना खाली सोडण्यात आले. त्यावेळी दोघेही भाऊ हातात हात घेऊनच तिथे मृतावस्थेत आढळल्याने एकच धक्का बसला. मृतदेह पाहताच नातेवाइकांनी टाहो फोडला.

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हातदोघे चुलत भाऊ. दोघांची नेहमीची गट्टी. एकत्रितच खेळायचे. आज दोघेही एकाच वेळी खेळताना गायब झाले. स्वराज आणि शिवराज यांची दोस्ती पक्की होती. दिवसभराच्या शोधानंतर कयाधू नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हाही दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेले होते. अखेरच्या क्षणीही भावाचा हात सोडला नाही. हे दृश्य पाहून उपस्थित गहिवरून गेले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू