शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

दोन्ही अपहृत बालके सापडली पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:58 IST

शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. मुले अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी जवळपास शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यामुळे अखेर ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात हिंगोली येथून दोन मुले मिसिंग असल्याची माहिती व त्यांचे फोटोही संबधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, या खात्रीसाठी मोबाईलवर फोटोही पाठविले. त्यानंतर हिंगोली येथीलच मुले असल्याचे स्पष्ट झाले.दोन्ही मुलांना पुणे येथील बालगृहात ठेवले आहे. संबंधित बालगृहाच्या अधीक्षकांशीही हिंगोली पोलिसांनी दूरध्वनीवरून संपर्क करून मुलांविषयी खात्री करून घेतली. लवकर दोन्ही मुले पालकांच्या स्वाधीन केले जातील, असे पोउपनि गोहाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. हिंगोली येथून पोलिसांचे पथक दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना घेऊन पुण्याला जाणार आहेत.पोलिसांचे पथक पुण्याला...हिंगोली येथील बेपत्ता मुले पुण्यात सापडली आहेत. त्यामुळे हे दोन्ही मुले पुण्यापर्यंत कसे काय पोहोचली. ती स्वत:हून गेलीत का? त्यांचे कोणी अपहरण केले. याची माहिती घेतली जाणार आहे. हिंगोली येथून पोलीस पथक पुण्याला जाऊन या दोन्ही बालकांना ताब्यात घेणार आहे. अचानक मुले बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु आता मुलांचा शोध लागल्याने नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लवकरच मुलांना त्यांच्या स्वाधीन केले जाईल. मुलांचे अपहरण करण्यात आल्याचे समजताच महिला व बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबधित शाळेची भेट घेऊन चौकशी केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी