शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

अरे देवा! वादळवाऱ्याचा पक्ष्यांनाही फटका; चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:23 IST

वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने वादळीवाऱ्याचा फटका बगळ्यांना सहन झाला नाही.

नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून रोज सायंकाळ व रात्रीच्यावेळी वादळवारे व अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांही पडत आहेत. दरम्यान, जोराच्या वादळामुळे कडती परिसरातील एका विहिरीत जवळपास चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

बुधवारी सायंकाळी नर्सीसह परिसरातील कडती, हनवतखेडा, देऊळगाव, गिलोरी, जांभरुण आदी ठिकाणी जोरदार वादळीवारे झाले. या वादळीवाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तसेच विजेचे खांबही रस्त्यावर कोसळले. वादळीवाऱ्यामध्ये कडती परिसरात झाडावर बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने वादळीवाऱ्याचा फटका बगळ्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते झाडाजवळ असलेल्या विहिरीत पडले.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने ११, १२ व १३ एप्रिल रोजी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ व १२ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत, १३ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. तसेच विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस