शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अरे देवा! वादळवाऱ्याचा पक्ष्यांनाही फटका; चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:23 IST

वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने वादळीवाऱ्याचा फटका बगळ्यांना सहन झाला नाही.

नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून रोज सायंकाळ व रात्रीच्यावेळी वादळवारे व अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांही पडत आहेत. दरम्यान, जोराच्या वादळामुळे कडती परिसरातील एका विहिरीत जवळपास चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

बुधवारी सायंकाळी नर्सीसह परिसरातील कडती, हनवतखेडा, देऊळगाव, गिलोरी, जांभरुण आदी ठिकाणी जोरदार वादळीवारे झाले. या वादळीवाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तसेच विजेचे खांबही रस्त्यावर कोसळले. वादळीवाऱ्यामध्ये कडती परिसरात झाडावर बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने वादळीवाऱ्याचा फटका बगळ्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते झाडाजवळ असलेल्या विहिरीत पडले.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने ११, १२ व १३ एप्रिल रोजी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ व १२ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत, १३ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. तसेच विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस