मुदतवाढ न दिल्यास लाभार्थी राहणार रेशनपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST2021-06-02T04:22:52+5:302021-06-02T04:22:52+5:30
यात म्हटले की, मे या महिन्याचे नियमित अन्नधान्य वितरण करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे; परंतु सद्यस्थितीत शासकीय ...

मुदतवाढ न दिल्यास लाभार्थी राहणार रेशनपासून वंचित
यात म्हटले की, मे या महिन्याचे नियमित अन्नधान्य वितरण करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे; परंतु सद्यस्थितीत शासकीय गोदामामध्येच मे महिन्याचे धान्य पोहोचले नाही. त्यामुळे दुकानदारांना मिळाले नाही. पुढे मुदत न मिळाल्यास लाभार्थीही वंचित राहणार आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत धान्य वाटप करायला आधीच विलंब होत आहे. त्यात वेळेत धान्य मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी दुकानदारांच्या नावे ओरड करीत आहेत. धान्यच न मिळाल्यास दुकानदारांनी तरी वाटप कसे करायचे? असा सवाल केला जात आहे. सामाजिक अंतर ठेवणे, एका दिवशी ठराविक संख्येतच लाभार्थ्यांना बोलावणे असे प्रयोग करावे लागत आहेत. त्यातही लाभार्थी आपल्या सोयीनेही बऱ्याचदा येतात; मात्र मे महिन्याचे धान्य दुकानातच पोहोचले नसतानाही वाटपाची मुदत संपल्याने त्याचा रोष दुकानदारांना सहन करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी मुदतवाढ न दिल्यास माहे मे २०२१ या महिन्याच्या ऑनलाइन व्यवहारानुसार भविष्यात की - रजिस्टरद्वारे नियतन निश्चित करत असताना पुन्हा अन्न धान्य नियतन कमी निश्चित होऊन गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले. अशी मुदत द्यायची झाल्यास रेशन दुकानदारापर्यंत दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त व उर्वरित १४ तारखेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे; मात्र त्यासाठी विहित मुदत चलन, ई पॉसवर धान्यसाठा उपलब्ध करून देणे, वाहतूक करणे या प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. त्यात दिरंगाई होत असल्याचेही म्हटले. मुदतवाढ देऊन भविष्यात या प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचा आदेश देण्याची मागणीही रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, फारुक पठाण, अशोक काळे यांनी केली.