शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

विद्युत कुंपणाने घात केला, बैलांचा जीव वाचविण्यास धावलेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:53 IST

या घटनेत दोन बैलांसह शेतकऱ्याचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

डोंगरकडा (जि. हिंगोली) : रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून बांधलेल्या विद्युत तारांना दोन बैल चिकटले. त्या बैलांना काढण्यासाठी शेतकरी सुभाष ग्यानोजी खंदारे (वय ३०) गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सुकळीवीर येथे रविवारी घडली.

पावसाने चांगली साथ दिली असल्यामुळे खरीप पिके जोमात आली आहेत. परंतु रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या आसपास तारा लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. २८ जुलै रोजी सुकळीवीर येथील आखाड्यावरील दोन बैल विद्युत प्रवाह असलेल्या तारांजवळ गेले व चारा खात असताना चिकटले गेले. हा प्रकार शेतकरी सुभाष खंदारे यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलांना तारांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत दोन बैलांसह शेतकऱ्याचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच डोंगरकडा चौकीचे जमादार नागोराव बाभळे व गणेश गायकवाड यांनी सुकळीवीर येथे जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन, प्रशांत स्वामी, साहेबराव चौरे यांनी शवविच्छेदन केले. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. तपास जमादार नागोराव बाभळे हे करीत आहेत. या घटनेमुळे डोंगरकडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र