शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

दर्जाहीन कामावरून आक्रमक शेतकऱ्यांनी बोराळा साठवण तलावाचे काम बंद पाडले

By रमेश वाबळे | Updated: February 10, 2025 18:40 IST

बोराळा, बोराळवाडी शिवारातील जवळपास ५१ हेक्टर जमिनीवर साठवण तलाव होत आहे.

हिंगोली : तालुक्यातील बोराळा येथे साठवण तलावाचे काम सुरू असून, हे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप करीत शेतकरी, ग्रामस्थांनी या कामास विरोध दर्शविला आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी तलाव परिसरात येत काम बंद केले. जोपर्यंत कामाची चौकशी होत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बोराळा, बोराळवाडी शिवारातील जवळपास ५१ हेक्टर जमिनीवर साठवण तलाव होत आहे. या तलावाचे काम गतवर्षी सुरू करण्यात आले, तर पावसाळ्यात काही महिने काम बंद होते. आता पुन्हा काम हाती घेण्यात आले असून, तलावाच्या भिंतीत काळी माती, मुरुमाची दबाई व्यवस्थित करण्यात आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय सांडवाची भिंत आणि तलावाच्या डाव्या बाजूला उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीला तडे गेले आहेत. ही बाब संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देण्यात आली. परंतु, कामाचा दर्जा सुधारण्यात आला नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

१० फेब्रुवारी रोजी गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी तलाव परिसरात येत रोष व्यक्त केला. यादरम्यान संबंधितांना काम बंद करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. यादरम्यान जोपर्यंत कामाची चौकशी होत नाही, कामाचा दर्जा सुधारला जात नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

यंत्रणेचे दुर्लक्ष;  शेतकऱ्यांत रोष...साठवण तलावात बोराळा आणि बोराळवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. परंतु, परिसराचा पाणीप्रश्न मिटेल, टंचाई दूर होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी तलावाला विरोध केला नाही. परंतु, आता काम दर्जाहीन होत असल्यामुळे रोष व्यक्त होऊ लागला आहे. हा तलाव गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. शिवाय तलावाची भिंत गावाच्या बाजूने असल्याने काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात गावाला धोका निर्माण होऊ शकतो. याकडे मात्र जलसंपदा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीagitationआंदोलनMarathwadaमराठवाडा