शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:27 IST

सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी बसेस पेटवून दिल्या तर कुठे फोडल्या त्यामुळे आगरातून सात दिवसांपासून बसेस सोडण्यात आल्या नव्हत्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. याच काळात तर खाजगी वाहन धारकांनी मनमानी टिकट आकारुन प्रवाशांची एक प्रकारची लुटच केली होती. सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी हिंगोली आगारातून ८ बसेस सोडण्यात आल्या होत्या तर कळमनुरी आगारातून ४ आणि वसमत आगारातून दोन दिवसांपासून बसेस सोडण्यात येत आहेत. एकंदरीत सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टळण्यास मदत झाली होती. अजूनही बस चालकांसह वाकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मात्र खाजगी वाहन चालकांने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच आगारामधून बस बाहेर घेऊन जात आहेत. काही प्रमाणात जिल्ह्यात शांत वातावरण झाल्यामुळे तरी कुठे प्रवाशांची होणारी गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. तर अजूनही बऱ्याच गावात रास्ता रोको सुरु असल्याचे चित्र आहे.---वसमत : दोन दिवसांपासून बस सुरुगेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेली एस.टी. वाहतूक हळूहळू पुर्णपदावर येत आहे. वसमत आगाराने गेल्या दोन दिवसांपासून ठराविक मार्गावर बस सोडल्या आहेत. तर मंगळवारी नांदेड, परभणी रस्त्यावरील सर्व गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरु असल्याने एस.टी. वाहतूक बंद होती. वसमत आगारातून तब्बल पाच दिवस एकही बस बाहेर पडली नव्हती. प्रवाशी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. दोन दिवसांपासून वसमत आगारातून ठरावीक फेºया सोडणे सुरू केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षणBus Driverबसचालक