शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा खून करून सासरच्यांना अडकवले; चाणाक्ष पोलिसांनी उलगडा करत मुलास ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 19:55 IST

पैश्याच्या वादातून सासू-सासरे आणि मेव्हण्यानेच वडिलांचा खून केल्याची दिली होती तक्रार

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आपल्या सासरच्या मंडळीकडूनच दगा फटका झाला आणि त्यांनीच वडिलांचा खून केला अशी तक्रार मयताच्या मुलाने दिली होती. यावरून सासू-सासरा आणि मेव्हुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या खून खटल्यातील तपासाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली असून पित्याच्या खून प्रकरणी तक्रारदार मुलालाच बाळापुर पोलिसांनी अटक केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा तांडा ते एकघरी या परिसरात दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी आप्पाराव रामा राठोड , (वय 53 वर्ष ,राहणार कासारपेठ तांडा, तालुका भोकर जि.नांदेड ) यांचा मृतदेह आढळून आला होता. बाळापूरचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड व इतरांनी मयताची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यावेळी सदर मयत व्यक्ती हे भोकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले .तेथील व्यक्तीने रामेश्वर तांडा येथे येऊन कशी काय आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा विठ्ठल आप्पाराव राठोड ( खाजगी नोकरी, हल्ली मुक्काम कॅप्टन चौक, उदगीर ) याने पैशाच्या वादातून आपल्या सासरच्या मंडळींनी वडिलांचा खून करून मृतदेह शिवारात फेकला असा आरोप करत तक्रार दिली. 

सरकारी नोकरी लावतो म्हणून माझ्या वडिलांकडून 9 लाख रुपये घेतले होते. नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. या वादातूनच वडिलांचा खून झाल्याचा आरोप मुलाने केला. त्यावरून स्वतःचे सासू , सासरा आणि मेव्हणा यांचे नावे सांगून त्यांना आरोपी केले. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी खूप तपास केला. अनेकांचे जबाब नोंदवले .या खुणाचे रहस्य उलगडणाचा प्रयत्न केला. दरम्यान, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून या फिर्यादी मुलासच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या खून प्रकरणी चक्क मुलगाच आरोपी निघाला. पोलिसांनी विठ्ठल आप्पाराव राठोड यास आरोपी म्हणून अटक केले आहे. न्यायालयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली