शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:13 IST

एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.

हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवार (दि.९ ) पासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी रात्री मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. गोशाळेत जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द, रामवाडी, उमरा या गावांना भेटी दिल्या. तसेच सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक या दुर्गम भागात जाऊन त्यांनी गोशाळेत मुक्काम केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करू असे  आश्वासन दिले. 

आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा

भविष्यात चारा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील. काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये मागेल त्या गावाला टँकर तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेतकरी, पशुपालक व नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळDilip Kambleदिलीप कांबळेHingoliहिंगोली