शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:23 IST

मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.कयाधू नदीला पूर आल्याने सोडेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सोडेगाव, नांदापूर, असोला, बोल्डा, बोल्डावाडी, करवाडी, हरवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. २० आॅगस्टच्या मध्यरात्रीपासूनच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर कोंढूर, डोंगरगाव पूल, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव या गावाला पुराचे पाणी भिडले आहे. कयाधू नदीवर सावंगी (भू), चाफनाथ, सोडेगाव, सालेगाव, नांदापूर, डिग्रस कोंढूर, कसबे धावंडा, येगाव, चिखली, शेवाळा, येलकी, पिंपरी बु., सावळी, डोंगरगाव पुल आदी १४ गावे वसलेली आहे. या नदीला पुर आल्याने पुराचे पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत.ही पिके हातची गेली असून शेतकरी पिकांना पाण्याखाली पाहून हतबल झाला आहे. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी कोंढूर, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव आदी गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.कयाधू नदीच्या काठावरील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २१ आॅगस्ट रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते. शाळेतही विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावलेली होती तर शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. विहिरी, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत.जिल्ह्यात मंडळनिहाय पर्जन्यमान असे हिंगोली-८१, खांबाळा-६५, माळहिवरा-७८, सिरसम बु.-७७, बासंबा ८२, नर्सी ना.-४८, डिग्रस -३७, कळमनुरी-९0, नांदापूर-९५, आखाडा बाळापूर-७५, डोंगरकडा-५८, वारंगा फाटा-६१, वाकोडी-१८, सेनगाव-४0, गोरेगाव-५0, आजेगाव-५५, साखरा-१२,पानकनेरगाव-४५, हत्ता-४८, वसमत-३२, हट्टा-६१, गिरगाव-३७, कुरुंदा-६0, टेंभूर्णी-३५, आंबा-६0, हयातनगर-७४, औंढा ना.-८७, जवळा बा.-७९, येहळेगाव-९३, साळणा-७७ मिमी. जिल्ह्याची एकूण सरासरी ६१.९६ मिमी आहे.जिल्ह्याचे यंदाचे आतापर्यंतचे पर्जन्य ६४३.0६ मिमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पर्जन्य झाले. यात हिंगोली-७३.४0, वसमत-६३.८१, कळमनुरी-७७.२८, औंढा-८१.९0, सेनगाव-६४.८0 टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस