शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:23 IST

मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.कयाधू नदीला पूर आल्याने सोडेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सोडेगाव, नांदापूर, असोला, बोल्डा, बोल्डावाडी, करवाडी, हरवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. २० आॅगस्टच्या मध्यरात्रीपासूनच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर कोंढूर, डोंगरगाव पूल, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव या गावाला पुराचे पाणी भिडले आहे. कयाधू नदीवर सावंगी (भू), चाफनाथ, सोडेगाव, सालेगाव, नांदापूर, डिग्रस कोंढूर, कसबे धावंडा, येगाव, चिखली, शेवाळा, येलकी, पिंपरी बु., सावळी, डोंगरगाव पुल आदी १४ गावे वसलेली आहे. या नदीला पुर आल्याने पुराचे पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत.ही पिके हातची गेली असून शेतकरी पिकांना पाण्याखाली पाहून हतबल झाला आहे. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी कोंढूर, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव आदी गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.कयाधू नदीच्या काठावरील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २१ आॅगस्ट रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते. शाळेतही विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावलेली होती तर शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. विहिरी, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत.जिल्ह्यात मंडळनिहाय पर्जन्यमान असे हिंगोली-८१, खांबाळा-६५, माळहिवरा-७८, सिरसम बु.-७७, बासंबा ८२, नर्सी ना.-४८, डिग्रस -३७, कळमनुरी-९0, नांदापूर-९५, आखाडा बाळापूर-७५, डोंगरकडा-५८, वारंगा फाटा-६१, वाकोडी-१८, सेनगाव-४0, गोरेगाव-५0, आजेगाव-५५, साखरा-१२,पानकनेरगाव-४५, हत्ता-४८, वसमत-३२, हट्टा-६१, गिरगाव-३७, कुरुंदा-६0, टेंभूर्णी-३५, आंबा-६0, हयातनगर-७४, औंढा ना.-८७, जवळा बा.-७९, येहळेगाव-९३, साळणा-७७ मिमी. जिल्ह्याची एकूण सरासरी ६१.९६ मिमी आहे.जिल्ह्याचे यंदाचे आतापर्यंतचे पर्जन्य ६४३.0६ मिमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पर्जन्य झाले. यात हिंगोली-७३.४0, वसमत-६३.८१, कळमनुरी-७७.२८, औंढा-८१.९0, सेनगाव-६४.८0 टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस