शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:55 AM

हिंगोली: जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२० मध्ये गारपीट व अवकाळी पावसाने तब्बल ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. ...

हिंगोली: जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२० मध्ये गारपीट व अवकाळी पावसाने तब्बल ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी जिल्ह्याला १३०.१८ लक्ष रूपयांचा निधी वितरीत केला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा केला जणार आहे.

राज्यभरात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने कृषी आयुक्तालयाला केल्या होत्या. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्याला १३०.१८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नुकताच शासनाने वितरीत केला असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. नियमानुसार शेती, बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्क्े अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात शासनाने शासन निर्णय जारी केला असून ही मदत कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना वाटप करावी, मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.