शेतकरी विमा योजनेलाच ‘अपघात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST2021-03-04T04:56:44+5:302021-03-04T04:56:44+5:30
रस्ता अपघात, वाहन अपघात, विजेचा धक्का लागणे, सर्पदंश, पाण्यात बुडून किंवा उंचावरुन पडल्यानंतर मृत्यू झाल्यास शेतकऱ्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी ...

शेतकरी विमा योजनेलाच ‘अपघात’
रस्ता अपघात, वाहन अपघात, विजेचा धक्का लागणे, सर्पदंश, पाण्यात बुडून किंवा उंचावरुन पडल्यानंतर मृत्यू झाल्यास शेतकऱ्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजनेद्वारा २ लाखांचे सहानुभूती अनुदान मिळते. मृत्यू झाल्यास २ लाख तर एखादा अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांचे शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातून ६९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु, संबंधित कंपनीकडून १७ प्रस्तावच मंजूर केले आहेत. उर्वरिरत ४१ प्रस्ताव अजूनही धूळखात पडलेले असून त्याचा विचार केला नाही. कृषी विभागाने पाठपुरावा केला असला तरी ४१ प्रस्ताव कशासाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.कृषी विभागाच्या विभागाच्या म्हणण्यानुसार १० कंपनीकडे तर ४१ हे कागदपत्राअभावी मंजूर झाले नाहीत. यामध्ये १९ प्रस्तावाची पूर्तता केली आहे.
बॉक्स
कोणाला किती मिळते मदत?
एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यास शासनाच्या वतीने २ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. अपघातात एखादा अवयव निकामी झाल्यास त्यास १ लाख रुपयाचे सहानुभूत अनुदानही दिले जाते.
प्रतिक्रिया
अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे सर्वच प्रस्ताव आपण कंपनीकडे पाठविले आहेत. पाठविलेल्या ६९ प्रस्तावापैकी १७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे ४१ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत.
जास्तीत जास्त प्रस्ताव कसे मंजूर होतील यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. प्रलंबित प्रस्तावाबाबत कंपनीला कळविले आहे. विजय लोखंडे
जिल्हा कृषी अधीक्षक, हिंगोली