शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्मितीची क्षमता माता, मातीत आहे-रिठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:02 IST

मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ३ जानेवारी रोजी व्याख्यात्या प्रा. मनीषा रिठ्ठे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ३ जानेवारी रोजी व्याख्यात्या प्रा. मनीषा रिठ्ठे यांनी केले.अ‍ॅड. ग्यानबाराव सिरसाट विचार मंच महावीर भवन येथे मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई चव्हाण, उद्घाटक वन अधिकारी मनीषा पाटील, प्रमुख अतिथी कर सहाय्यक अधिकारी कांचन मुटकुळे, अ‍ॅड. सुनीता देशमुख, वर्षाताई सरनाईक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, जयश्री घोडे आदींची उपस्थिती होती. प्रा. रिठ्ठे म्हणाल्या, सावित्री घडवायची असेल तर सर्वप्रथम पुरूषांनी ज्योतीबा होणे गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीत सावित्रीबार्इंनी कष्ट केले. तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारे खुली केली. पण सावित्रीने दिलेले शिक्षण आपण आज घेत नाही. केवळ कागदाची डिग्री म्हणजे शिक्षण नव्हे, कर्मकांडातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारं शिक्षण हवं.महिलांनी शेतीचा शोध लावला, नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत असून यासाठी नवनिर्मिती सृजनशिलता वाढली पाहिजे, या गोष्टींचे पोषण केले पाहिजे, स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. मग ती कोणतीही असो. सती प्रथेपासूनचा जोहारापर्यंतचा प्रवास आजही २१ व्या शतकात बदलला नाही. केवळ स्त्रीमुक्तीच्या गप्पा सुरू आहेत. पण वास्तव मात्र वेगळे आहे. स्त्रीयांनी बालविवाह, सतीप्रथा या खडतर परंपरेतून प्रवास केला. पूर्वीची मानसिकता स्त्रीविकासाला आड येते. त्यामुळे स्त्रीयांनीही स्वत: सक्षम झाले पाहिजे. मुलांना संस्कारित करून महामानवांच्या विचाराची आदर्श पिढी घडविण्याचे काम महिलांवर आहे. आजही स्त्रीयांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ती केवळ भोगवस्तू म्हणून वापरली जाते, अशी खंतही प्रा. त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक स्त्री अथवा पुरूष वाईट नसतो, वाईट असते ती समाजमनातील मानसिकता. ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन ज्योती वारे, अर्चना कोकाटे यांनी केले. तर आभार राजश्री क्षिरसागर यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक