शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:00 IST

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

कळमनुरी ( जि.हिंगोली): कळमनुरी शहरासह परिसरास मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीचा तडाखा बसला. यात तालुक्यातील जटाळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मंगळवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जटाळवाडी येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस सुरू झाल्याने देवराव रुद्राजी बाभळे ( 65) यांनी शेतातील झोपडीचा सहारा घेतला. मात्र, वादळाने झोपडीवरील टीनपत्रे उडून गेली. यातच गारपीटीचा मारा वाढला. थंडी, पाऊस आणि गारपीटीच्या मर्याने हृदयविकाराचा झटका येऊन बाभळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी दिली. 

यासोबतच कनका येथेही वादळ वारा व गारांच्या पावसामुळे बापूराव जाधव यांच्या चार शेळ्या, एका गाईचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून दगडाने चार जण जखमी झाले आहेत. कळमनुरी शहरासह मुंढळ, रामवाडी, वाकोडी, आसोलवाडी, मसोड, जटाळवाडी ,कनका, राजुरा ,शिवणी( खुर्द) या परिसरात बागायती पिके पपई, करडई, आंबे, कांद्याच्या बिया व संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर झाडेही ऊनमडून पडली आहेत. महावितरणचे विजेचे पोल व तारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून  अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रHailstormगारपीटHingoliहिंगोली