शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 19:40 IST

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात.

हिंगोली : यावर्षीच्या पावसाळ्यातील दीड महिन्याचा कालावधी लोटला असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २४.२१ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २६.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. नांदेड जिल्ह्यात मानार, विष्णुपुरी हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मानार प्रकल्पात ३७.२० दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे तर विष्णुपुरी प्रकल्पात ४७.३० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. नांदेडच्या ९ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २९.५९ दलघी आणि ९ उच्च पातळी बंधाऱ्यात २८.९७ दलघमी पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ३३.२४ दलघमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत २५४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्या तुलनेत सध्या केवळ १७६.२९ दलघमी पाणीसाठा झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प असून, त्यात सध्या २४३.६३ दलघमी (३० टक्के) पाणीसाठा झाला आहे. सिद्धेश्वर प्रकल्प अजूनही कोरडाच आहे. तर २७ लघू प्रकल्पांमध्ये ७.६० दलघमी पाणीसाठा आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यात केवळ १.५२ दलघमी जलसंचय झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये २९.४३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात १.४८ दलघमी पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९८.२५ दलघमी पाणीसाठ्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात ३०.९२ दलघमी पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी होता ४३ टक्के पाणीसाठानांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५२४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ८३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ३०.३२ टक्के एवढी आहे. मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये ११९४.४१ दलघमी पाणीसाठा झाला होता. त्याची टक्केवारी ४३.५९ टक्के एवढी होती.

कोणत्या प्रकल्पात किती टक्के साठा?मानार : २६.९२विष्णुपुरी : ५८.५५येलदरी : ३०.०९सिद्धेश्वर : निरंकइसापूर : ३८.४७

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीNandedनांदेड