शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

८९ ग्रामपंचायती आल्या पीएफएमएसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींकडून पीएफएमएस प्रणालीवरून सगळे व्यवहार करायचे असल्याने ही प्रणाली सुरू करण्यात अडचणी येत असल्याने ओरड होत ...

हिंगोली जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींकडून पीएफएमएस प्रणालीवरून सगळे व्यवहार करायचे असल्याने ही प्रणाली सुरू करण्यात अडचणी येत असल्याने ओरड होत आहे. मात्र काही ग्रामपंचायतींनी यासाठी टाळाटाळही चालविली आहे. यापूर्वी ‘लोकमत’मधून याबाबत वृत्त आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपमुकाअ मिलिंद पोहरे यांनी सर्व पंचायत समित्यांना सूचित करून पीएफएमएसवर जुनी माहिती अद्ययावत करण्यासाठी मोहीम आखली होती. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींची डिजिटल साईनची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. आता माहिती अद्ययावत केल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, याची काळजी घ्यायची आहे. मात्र अनेक ठिकाणी त्यासाठी आवश्यक दस्तावेजच ग्रामसेवकांमार्फत उपलब्ध करून दिले जात नसल्याची समस्या समोर येत आहे. पूर्वी प्रशासन सतर्क नव्हते, आता ते सतर्क झाले, तर खालच्या यंत्रणेत ताळमेळ नाही. त्याचा फटका म्हणून ग्रामपंचायतींची विकास कामे ठप्प झाली आहेत.

कामाला गती मिळणे अपेक्षित

मागील दीड ते दोन महिन्यांपासून पीएफएमएस प्रणालीवरून ओरड सुरू आहे. आतापर्यंत ५० टक्के ग्रामपंचयतींचा कारभार तरी या प्रणालीवरून रुळावर येणे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नाही. काही ग्रामपंचायतींमध्ये याला जणू विरोधच आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन करावे लागणार असल्याने सरपंच नाखूश आहेत. मात्र काहींनी १५ लाखांपर्यंतची कामे करण्याचा अधिकार ग्रा.पं.ला असल्याने त्या चौकटीत कामे करण्याची तयारी चालविली आहे.

ग्रामपंचायतींना सूचना व मदतही

ग्रामपंचायतींनी पूर्ण व्यवहार पीएफएमएसवर करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत आहेत. शिवाय ही प्रणाली विकसित करण्यासाठी अपेक्षित मदत पंचायत विभागाकडून केली जात आहे. जर यात दिरंगाई केली तर कारवाईची शिफारस करावी लागेल, असे उपमुकाअ डॉ. मिलिंद पोहरे यांनी सांगितले.

तालुकानिहाय परिस्थिती

तालुका एकूण ग्रा. पं. पीएफएमएस ग्रा. पं.

सेनगाव १०७ ४५

हिंगोली १११ १०

वसमत ११९ १२

कळमनुरी १२५ १३

औंढा १०१ ९