इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:18+5:302021-04-17T04:29:18+5:30

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध ...

59.88% water storage in Isapur dam | इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाची पाण्याची पातळी ४३६.७९० मीटर आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ५७७.३३३ द.ल.घ.मी. आहे. धरणात तालुक्यातील १४ गावे गेली आहेत. परंतु, या धरणाचा म्हणावा तसा फायदा तालुक्याला होत नाही.

सात वर्षांनंतर पहिल्यांदाच यावर्षी हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सध्या धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे क्षेत्रफळ नऊ हजार ६३४ हेक्‍टर आहे. २०१३ मध्ये धरण शंभर टक्के भरले गेेले. त्यानंतर २०२० मध्येच धरण शंभर टक्के भरले होते.

उन्हाळी पिकांना पाणी देणे सुरू

सद्य:स्थितीत उन्हाळी पिकांना उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे इसापूर धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे धरणातून पैनगंगा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून इसापूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता एस. एम. सूर्यवंशी यांनी दिली.

कळमकोंडा, देवदरीने तळ गाठला

गत पंधरा-वीस दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रखर उन्हामुळे तालुक्यातील कळमकोंडा व देवदरी तलावांनी सद्य:स्थितीत तळ गाठला आहे. उन्हाळा संपायला अजून दीड महिना बाकी आहे. शहर व तालुक्यात कुठे पाईपलाईनद्वारे गळती होत असेल तर त्याबाबत प्रशासनाला कळवावे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

Web Title: 59.88% water storage in Isapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.