शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

५0 पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:04 IST

ग्रामीण भागात पुरेसे व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. मात्र जिल्ह्यातील जवळपास १७८ पैकी ५0 पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद आहेत.

हिंगोली : ग्रामीण भागात पुरेसे व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. मात्र जिल्ह्यातील जवळपास १७८ पैकी ५0 पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद आहेत.

जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावांत पाण्याच्या सुविधेसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु सदर योजनांना घरघर लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार, हे निश्चित. तर काही योजनेतील पाणीपुरवठ्याचे विद्युत देयके भरली नाहीत. त्यामुळे महाविरणने थेट वीज तोडली आहे. जवळपास ८ कोटींचा वीजबिल भरणा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना, २३ गावे सिद्धेश्वर योजना, ८ गावे गाडीबोरी योजनेची वीज तोडण्यात आली आहे. तर २६ गावे मोरवाडी योजनेअंतर्गत केवळ आठ गावांना सदर योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय गावातील विविध तांत्रिक अडचणी, आपसी वादामुळेही पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाला आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठ्यातील ५० योजना कार्यान्वीत केल्या होत्या. परंतु येथील पाणीपातळी खालावल्याने, शिवाय विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे या ५० योजनांनाही घरघर लागली आहे. आता ऐन उन्हाळ्यात या गावांची स्थिती बदलणे शक्य नाही. मात्र टंचाईतही ही गावे वंचितच राहणार आहेत.

मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील कारवाडी पा.पु.योजना, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर व वारंगा, औंढा तालुक्यातील येहळेगाव सोळंके, वसमत तालुक्यातील सोमठाणा, करूंदा व हट्टा पाणीपुरवठा योजना आहेत. यातील नांदापूर,वारंगा व हट्टा येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेस मंजुरी मिळाली आहे. हट्टा येथील योजनेचे काम महाराष्टÑ जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत केले जाणार असून नांदापूर व वारंगा योजनेचे जि. प. पाणीपुरवठा अंतर्गत काम केले जाणार आहे.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कारवाडी, नांदापूर, वारंगा, येहळेगाव सो., सोमठाणा, कुरूंदा व हट्टा कामांसाठी शासनातर्फे १४ कोटी ९७ लाख निधी खर्च करण्याची तरतूद केली आहे.

पूर्णवेळ प्रमुख नाहीमागच्या सभेतच पाणीपुरवठा विभागाच्या कामावरून सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नाही. प्रभारींना दिवस काढायचे आहेत. पदभार काढायचा ठराव होवूनही कुणी पर्याय उपलब्ध नाही.शिवाय दोन्हीकडच्या ताणामुळे ते सक्षमपणे काम करू शकत नाहीत. शासन पूर्णवेळ कार्यकारी अभियंता देत नाही. त्यामुळे या विभागाची बोंब अजूनही कायमच आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणीChief Ministerमुख्यमंत्रीmahavitaranमहावितरण