५ आरोपींना दोन वर्षांसाठी केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:04+5:302021-01-24T04:14:04+5:30
हिंगोली : टोळीने गुन्हे करणाऱ्या पाच आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी २२ जानेवारी रोजी ...
हिंगोली : टोळीने गुन्हे करणाऱ्या पाच आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी २२ जानेवारी रोजी काढले आहेत. आतापर्यंत वसमत शहर व हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत ११ आरोपींच्या हद्दपारीचे आदेश निघाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.
टोळीने गुन्हे करणाऱ्या आरोपींना हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सुरू केली आहे. वसमत शहरातही टोळी प्रमुख रेशमसिंग रतनसिंग चव्हाण, सदस्य रणजितसिंग रतनसिंग चव्हाण, किरणसिंग रतनसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग रणजितसिंग चव्हाण, नानकसिंग ऊर्फ राजूसिंग पिता गुरुपालसिंग ऊर्फ गुरुमुखसिंग चव्हाण (सर्व रा. शिकलकरी वस्ती स्टेशन रोड वसमत) हे टोळीने गुन्हे करत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ (१) प्रमाणे जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय पोहेकॉ विलास सोनवणे यांनी कामकाज पाहिले. आतापर्यंत ११ आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.