शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:53 IST

जिल्ह्यात प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. मागील काही दिवसांपासून जि.प.च्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी सदस्य आवाज उठवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. मागील काही दिवसांपासून जि.प.च्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी सदस्य आवाज उठवत आहेत.जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-१६६, वसमत-१९0, कळमनुरी-२0१, औंढा नागनाथ-१५८ तर सेनगाव १६७ एवढी आहे. यापैकी आॅडिट करण्यात आलेल्या शाळांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-२, वसमत-४६, कळमनुरी-११, औंढा ३, सेनगाव १६७ अशी आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅडिटचे काम अजूनही सुरूच आहे. हे काम पूर्ण न झाल्याने अजूनही या अहवालाला पूर्णत्व येण्यात अडचणी आहेत. मात्र दिलेल्या अहवालानुसार हिंगोलीत ४, वसमतला १0२, कळमनुरीत ५४, औंढ्यात ८ तर सेनगावात २१८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे. सर्व शिक्षा अभियानात यापूर्वी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत होता. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून शासनाने यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे नवीन शाळाखोल्या मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यातच जि.प.कडे मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची अद्ययावत आकडेवारी नसल्याने नवीन प्रस्ताव पाठविण्यातही अडचणी येत होत्या. अल्पसंख्याक विकास योजनेत काही गावांच्या शाळाखोल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झाल्या होत्या. त्यात केवळ हिंगोली तालुक्याचाच समावेश आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र अशा प्रकारची कामे ठप्पच असल्यात गणती आहेत.अनेक ठिकाणच्या तर यापूर्वीच्याच इमारती अजून पूर्ण झाल्या नाहीत. अशा इमारतींचीही माहिती वारंवार सर्व शिक्षा अभियानाकडे प्रशासन मागवत आहे. मात्र त्यात तेच ते अहवाल दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. अशा कामांमध्ये निधीही मोठ्या प्रमाणात अडकून पडलेला आहे. अशा रखडलेल्या कामांचाही अनेक ठिकाणचा आढावा घेणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही शाळाखोल्यांची गरज असताना त्या मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी एक किंवा दोन खोल्या वर्ग चार ते सात आहेत. यापूर्वी योग्य नियोजनाअभावी ठराविक भागातच वर्गखोल्या मंजूर झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यापुढे याकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध होईल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. सध्या तरी जिल्ह्यात ३८६ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. सर्व ८८२ शाळांचे सर्वेक्षण झाल्यावर त्यात किती वाढ होईल, हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा