शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:53 IST

जिल्ह्यात प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. मागील काही दिवसांपासून जि.प.च्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी सदस्य आवाज उठवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. मागील काही दिवसांपासून जि.प.च्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी सदस्य आवाज उठवत आहेत.जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-१६६, वसमत-१९0, कळमनुरी-२0१, औंढा नागनाथ-१५८ तर सेनगाव १६७ एवढी आहे. यापैकी आॅडिट करण्यात आलेल्या शाळांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-२, वसमत-४६, कळमनुरी-११, औंढा ३, सेनगाव १६७ अशी आहे. अनेक तालुक्यांमध्ये आॅडिटचे काम अजूनही सुरूच आहे. हे काम पूर्ण न झाल्याने अजूनही या अहवालाला पूर्णत्व येण्यात अडचणी आहेत. मात्र दिलेल्या अहवालानुसार हिंगोलीत ४, वसमतला १0२, कळमनुरीत ५४, औंढ्यात ८ तर सेनगावात २१८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे. सर्व शिक्षा अभियानात यापूर्वी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत होता. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून शासनाने यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे नवीन शाळाखोल्या मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यातच जि.प.कडे मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची अद्ययावत आकडेवारी नसल्याने नवीन प्रस्ताव पाठविण्यातही अडचणी येत होत्या. अल्पसंख्याक विकास योजनेत काही गावांच्या शाळाखोल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झाल्या होत्या. त्यात केवळ हिंगोली तालुक्याचाच समावेश आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र अशा प्रकारची कामे ठप्पच असल्यात गणती आहेत.अनेक ठिकाणच्या तर यापूर्वीच्याच इमारती अजून पूर्ण झाल्या नाहीत. अशा इमारतींचीही माहिती वारंवार सर्व शिक्षा अभियानाकडे प्रशासन मागवत आहे. मात्र त्यात तेच ते अहवाल दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. अशा कामांमध्ये निधीही मोठ्या प्रमाणात अडकून पडलेला आहे. अशा रखडलेल्या कामांचाही अनेक ठिकाणचा आढावा घेणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही शाळाखोल्यांची गरज असताना त्या मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी एक किंवा दोन खोल्या वर्ग चार ते सात आहेत. यापूर्वी योग्य नियोजनाअभावी ठराविक भागातच वर्गखोल्या मंजूर झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यापुढे याकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध होईल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. सध्या तरी जिल्ह्यात ३८६ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. सर्व ८८२ शाळांचे सर्वेक्षण झाल्यावर त्यात किती वाढ होईल, हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा