शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:51 AM

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.शासनाने कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यात कोणतीही अडचण नसलेल्या ३३ हजार ९९३ शेतकºयांसाठी ११९.२८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७७२ खातेदारांना २४.४७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ११ हजार ४५ जणांना ६२.२४ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६१७६ खातेदारांसाठी ३२.५५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. मात्र यापैकी ३३ हजार ६0८ शेतकºयांच्या खात्यावर १0३.९८ कोटी प्रत्यक्ष जमा झाले आहेत.याशिवाय माहिती जुळत नसल्याने प्रलंबित असलेले ३३0३५ अर्ज आहेत. तर काहींचे अर्जच दुहेरी, तिहेरी असल्याने एकूण ३३ हजार ४६२ अर्ज तालुका समितीकडे निर्णयास्तव पाठविले होते. त्यात दुरुस्ती झाल्यानंतर समितीने २९ हजार ६८४ अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोडींगला पाठविले आहेत. यात हिंगोली-७९६७, वसमत-६९९६, औंढा ना.-२६९६, कळमनुरी-६५३२ तर सेनगाव- ५४९१ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे. या अर्जांची राज्य समितीकडे तपासणी झाल्यानंतर निकषात किती बसतील, याचा काही नेम नाही. या अर्जांमधून निकषात बसलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट आल्यास संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य आहे. तर हिंगोली-४४९, वसमत-९७0, औंढा ८१७, कळमनुरी-६६१ व सेनगाव ८८१ असे ३७७८ अर्ज बँकांच्या उदासीनतेमुळे तालुका समित्यांकडेच पडून आहेत. हे अर्ज अपलोड करण्याची मुदत संपूनही यात काहीच झालेले नाही.उदासीनता : दीड लाखांवरील कर्जज्यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज होते अशांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे ३३८५ शेतकरी आहेत. यात जि.म.स.च्या ११७९ शेतकºयांना ९१ लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२0६ शेतकºयांना १४.३७ कोटींचा लाभ मिळू शकतो. मात्र उर्वरित रक्कम नभरल्याने कर्जमाफीचे १५.२९ कोटी रुपयेही तसेच पडून आहेत. ही उर्वरित रक्कम भरण्याकडे शेतकºयांचा फारसा कल नाही. त्यातच यंदा अल्पपर्जन्यामुळे खरीप तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबीला फटका बसला. त्यामुळे याला प्रतिसाद मिळणे शक्य नाही.कर्जमाफीसाठी १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६९९३ पात्र ठरले. यातून ३३६0८ जणांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली. तर त्रुटी दूर करून अजून २९६८४ अर्ज शासनाकडे गेले आहेत.