शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:54 AM

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या २१२ ग्रामपंचायतींमध्ये ८८१ कामे सुरू असल्याचे मग्रारोहयोतून सांगण्यात आले. यामध्ये औंढा तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींत २७९, वसमत तालुक्यात २४ ग्रा.पं.त ९४, हिंगोली तालुक्यात ४० ग्रा.पं.त १७२, कळमनुरी तालुक्यात ६१ ग्रा.पं.त २३३, सेनगाव तालुक्यात २८ ग्रा.पं.त १०३ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कामांवर औंढा-३८३८, वसमत-९८८, हिंगोली-२२२२, कळमनुरी-२५९६, सेनगाव-१२६६ अशी तालुकानिहाय मजूर उपस्थिती आहे. सुरू असलेल्या या कामांमध्ये बहुतांश कामे ही विहिरींची असल्याचे सांगण्यात येते. काही पंचायत समित्यांमध्ये नवीन कामे सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात असली तरीही केवळ विहिरींच्या कामांमुळेच मजूरसंख्येत भर पडली आहे.या योजनेविषयी वाढत्या तक्रारींमुळे कामे होत नसून काही ठिकाणी तर नाहक तक्रारी करणाºयांचे टोळकेच निर्माण झाल्याचे दिसते. अशांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आल्यावर प्रशासनानेही त्यांचे मनोरंजन न केल्यास त्याला चाप बसू शकतो. शिवाय लोकप्रतिनिधींनीही नुसती कामे सुरू होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास ही वेळच येणार नाही.मग्रारोहयोत झालेल्या कामांची कुशलची रक्कम मात्र मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब सुरू आहे. यात ३.०७ कोटी रुपये थकले आहेत. यात औंढा-६६.७ लाख, वसमत-१८.०६ लाख, हिंगोली-३८.९८ लाख, कळमनुरी-९६.२७ लाख, सेनगाव-८७.३९ लाख अशी तालुकानिहाय रक्कम आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांची मिळून ५४ लाखांची मजुरी मिळणे बाकी असून ३६ लाख कळमनुरीचे आहेत.