शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:38 AM

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात १९ आग लागल्यच्या घटना घडल्या आहेत.मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अचानक आग लागण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आगीच्या १९ घटनांची नोंद पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे. महिनाभरात आग लागून नुकसानीच्या घटनामध्ये वाढ होत चालली असली तरी, पालिकेकडे सध्या एचक अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. एक अग्निशामक मागील सहा महिन्यांपासून नादुरूस्त झाल्याने भंगारात जमा करण्यात आले आले आहे. नवीन अग्निशामकची मागणी केली असून लवकरच पालिकेकडे वाहन उपलब्ध होईल. शिवाय नागरिकांनी दक्ष राहून आगीच्या घटनांबाबबत तात्काळ माहिती द्यावी. व आग लागू नये याची खबदारी सर्वांनीच घ्यावी असे अग्निशामक विभागाचे बाळू बांगर यांनी केले .हिंगोली शहरासह ग्रामीण भागात मागील एका महिन्यात आग लागल्याचे जवळपास १९ घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात अचानक आग लागून घरांचे, दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा महिन्यांपासून केवळ एकाच अग्शिामक वाहनांवर काम सुरू आहे.पुर्वी दोन अग्निशाम होते. परंतु त्यातील एक वाहन नादुरूस्त झाल्याने ते भंगारात जमा केले. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार एकाचा वाहनांवर सुरू आहे. नवीन अग्निशामक वाहनाची मागणी करण्यात आली आहे. लवकरच पालिकेला वाहन मिळणार आहे.सध्या कडाक्याचे उन्ह पडत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बीडी, सिगारेटमुळे पेट धरून आग लागेल असे कृत्य कोणी करू नये, शिवाय कचराही सार्वजनिक ठिकाणी जाळू नये.इडोळी येथे आग लागून साहित्य खाक४हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील ज्ञानबा विठोबा पानपट्टे यांच्या आखाड्याला आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. आगीत शेतीपयोगी औजारे, जमा करून ठेवलेले तुरीचे व, सोयाबीनचे कुटार, वैरण, दोन वर्षाचे शेणखत, गांडूळ खताचे १०० कट्टे अंदाजे ५० क्विंटल असे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यांनी अग्नीशमनला फोन करून दोन विद्युत मोटारी चालू असूनही ही आग आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दल आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या शेतकºयाकडे १० जनावरे आहेत. वैरण जळून खाक झाल्यामुळे या गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न पानपट्टे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग