शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: October 14, 2022 19:18 IST

पीक नुकसानीबाबत लावल्या जाताहेत जाचक अटी; मिळतो अत्यल्प परतावा

गोरेगाव (जि. हिंगोली) : पीकविमा कंपनीने दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीक नुकसानभरपाईबद्दल केवळ ८३४ रुपये एवढाच विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेकद्वारे परत करीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी व उत्पन्नघटीच्या फटक्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पीकहानीच्या जोखमीतून वाचण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीकविमा भरला जात आहे. मात्र, पीक नुकसानीबाबत जाचक अटी व निकष लावत विमा कंपनीकडून विम्याचा लाभ डावलला जात आहे, तर कधी अत्यल्प प्रमाणात विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टाच मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील शेतकरी बालाजी राजाराम शिंदे यांनी गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीकविमा काढला होता. ही विमा पॉलिसी अंतर्गत वर्षभराने का होईना शिंदे यांच्या बँक खात्यात २० सप्टेंबर २०२२ रोजी विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई परतावा म्हणून ८३४ रुपये जमा केले. पीकविमा कंपनीच्या थट्टेबद्दल संताप व्यक्त करीत शिंदे यांच्याकडून ८३४ रुपये थेट पंतप्रधानांना धनादेशाद्वारे परत करण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना निवेदन देत तहसीलदारांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

अठराशे रुपये खर्च करत विमा भरला...गतवर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे अठराशे रुपये खर्च करीत पीकविमा हप्ता भरला होता; परंतु त्या बदल्यात परतावा म्हणून केवळ ८३४ रुपये देऊन विमा कंपनीने थट्टा केली. हा प्रकार बघता ही ‘प्रधानमंत्री पीकविमा योजना’ नसून एक प्रकारची फसवणूक योजना आहे.- बालाजी शिंदे, शेतकरी, वरखेडा.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा