शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: October 14, 2022 19:18 IST

पीक नुकसानीबाबत लावल्या जाताहेत जाचक अटी; मिळतो अत्यल्प परतावा

गोरेगाव (जि. हिंगोली) : पीकविमा कंपनीने दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीक नुकसानभरपाईबद्दल केवळ ८३४ रुपये एवढाच विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेकद्वारे परत करीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी व उत्पन्नघटीच्या फटक्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पीकहानीच्या जोखमीतून वाचण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीकविमा भरला जात आहे. मात्र, पीक नुकसानीबाबत जाचक अटी व निकष लावत विमा कंपनीकडून विम्याचा लाभ डावलला जात आहे, तर कधी अत्यल्प प्रमाणात विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टाच मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील शेतकरी बालाजी राजाराम शिंदे यांनी गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीकविमा काढला होता. ही विमा पॉलिसी अंतर्गत वर्षभराने का होईना शिंदे यांच्या बँक खात्यात २० सप्टेंबर २०२२ रोजी विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई परतावा म्हणून ८३४ रुपये जमा केले. पीकविमा कंपनीच्या थट्टेबद्दल संताप व्यक्त करीत शिंदे यांच्याकडून ८३४ रुपये थेट पंतप्रधानांना धनादेशाद्वारे परत करण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना निवेदन देत तहसीलदारांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

अठराशे रुपये खर्च करत विमा भरला...गतवर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे अठराशे रुपये खर्च करीत पीकविमा हप्ता भरला होता; परंतु त्या बदल्यात परतावा म्हणून केवळ ८३४ रुपये देऊन विमा कंपनीने थट्टा केली. हा प्रकार बघता ही ‘प्रधानमंत्री पीकविमा योजना’ नसून एक प्रकारची फसवणूक योजना आहे.- बालाजी शिंदे, शेतकरी, वरखेडा.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा