शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सौर ऊर्जापंपांसाठी १६२७५ अर्ज ; कनेक्शन मात्र ४६५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

हिंग़ोली: सौरऊर्जा पंपासाठी जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, महावितरणने परिपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे ९ हजार ...

हिंग़ोली: सौरऊर्जा पंपासाठी जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, महावितरणने परिपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे ९ हजार ६४२ अर्ज बाद केले असून ४६५४ शेतकऱ्यांनाच कनेक्शन दिले आहेत. जून २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंपासाठी महावितरणकडे अर्ज केले होते. त्यातील ९ हजार ६४२ अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्या शेतकऱ्यांंना सौर उर्जेपासून दूरच रहावे लागले आहे. जिल्ह्यामध्ये महावितरणकडून ४ हजार ९७१ जणांना सौर पंपाचे कोटेशन दिले आहे. त्यातील ४ हजार ९६० शेतकऱ्यांनी महावितरणकडे कोटेशनची रक्कम जमा केली आहे. यानंतर महावितरणने ४ हजार ६५४ जणांना महावितरणच्या वतीने सौर पंपाचे कनेक्शन दिले आहे.

तालुकानिहाय सौर पंपाचा लाभ घेणारे शेतकरी

एप्रिल २१ ते मे २१

हिंगोली ५५

औंढा २८

सेनगाव २९

कळमनुरी २९

वसमत ४१

एप्रिल २० ते मार्च २१

हिंगोली ५७६

औंढा ४१३

सेनगाव ४२१

कळमनुरी ५२२

वसमत ६२६

एप्रिल १९ ते मार्च २०

हिंगोली ३२८

औौढा ३४०

सेनगाव २८४

कळमनुरी ४०१

वसमत ४३८

प्रतिक्रिया

सौर पंपासाठी अर्ज केला असता माझा अर्ज त्रुटीमध्ये आला आहे. सदरील त्रुटीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की माझ्या शेतामध्ये महावितरणकडून विद्युत पुरवठा असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, वीजपुरवठा हा वारंवार व ऐनवेळी येत असल्यामुळे अर्ज केला आहे. सौर उर्जेचा लाभ महावितरणने द्यावा, असे मला वाटते.

-रामराव थोरात, शेतकरी

सौर ऊर्जा पंपासाठी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, माझा अर्ज त्रुटीत आला आहे. त्यामुळे मी सौर ऊर्जा पंपापासून वंचित राहिलो आहे. शेताजवळून वीजपुरवठा गेला असल्यामुळे माझा अर्ज त्रुटीत आहे, असा संदेश महावितरणकडून प्राप्त झाला आहे.

-जगन्नाथ थोरात, शेतकरी

प्रतिक्रिया

सौर ऊर्जा पंपासाठी १६ हजार २७५ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. यामध्ये

४९७१ अर्जदारांनी कोटेशन भरले आहे. यापैकी ४६५४ सौर पंप कार्यान्वित केले आहेत. उर्वरित सौर ऊर्जा पंपाचे काम प्रगतीपथावर आहे. - सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता