शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पाचवी ते आठवीच्या जिल्ह्यातील १६ शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

कळमनुरी : कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून जिल्ह्यातील १६ शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या ...

कळमनुरी : कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून जिल्ह्यातील १६ शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ८९९ शाळा असून ८३ हजार ६५१ विद्यार्थी संख्या आहे. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने शाळा सुरू करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील ‘सर्व शाळा आपली शाळा’ सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव २९ व ३० जानेवारी रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, शाळेतील विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, पालकांचे संमतिपत्र, शाळा व्यवस्थापन समितीचे संमतिपत्र व सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचण्या झाल्यात का, आदीबाबतच्या माहितीचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. नंतर शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच शाळा सुरू होणार आहेत. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जिल्ह्यातील आणखी काही शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्या स्वच्छ करणे व सॅनिटायझर कराव्या लागणार आहेत.

पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ जानेवारी रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कोरोनाच्या महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. १८ जानेवारी रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासाठी सूचित केले होते. या पत्राचा आधार घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शाळा सुरू करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाबाबतच्या शासनाने दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उर्वरित शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू केल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, हात सॅनिटायझर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. २७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळा शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. उर्वरित शाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत पालकांची संमतिपत्र व शाळा व्यवस्थापन समिती ठराव असणे आवश्यक आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकही संमतीपत्र देत आहेत. घरी बसून विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झालेल्या बऱ्या असे विद्यार्थी सांगत आहेत. कोरोनाचे भय अजूनही गेलेले नाही. घरी बसून कंटाळलेले विद्यार्थी शाळेत गेलेले बरे असे सांगत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या नियमाचे पालन प्रत्येकाला करावे लागणार आहे.

आतापर्यंत काही शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत होते. ऑनलाइन धडे देत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहूनच शिक्षणाचे धडे घेतलेले बरे असे विद्यार्थ्यांना वाटत आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन सात ते आठ महिन्यांचा कालावधी संपलेला आहे. तुटपुंज्या वेळेत अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, असा प्रश्न शिक्षकांसमोर पडलेला आहे. जादा तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल, असे काही शिक्षक सांगत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने लवकरच जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सांगितले.