जिल्ह्यात नव्याने १४१ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:17+5:302021-05-13T04:30:17+5:30
१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ ...

जिल्ह्यात नव्याने १४१ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ६५ व्यक्ती, औंढा परिसर ६, कळमनुरी परिसर ३२, वसमत परिसर ८, सेनगाव परिसर १९ व्यक्ती असे एकूण १४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर १२७ कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी दाखल कोरोना रुग्णांपैकी ३२६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला, तर ३२ कोरोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. त्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे बुधवारी एकूण ३५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १४ हजार ५०९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १३ हजार ४०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण ८०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २९८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू तीनशेच्या उंबऱ्यावर
हिंगोली जिल्ह्यात आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये जवळा बाजार येथील ६५ वर्षीय महिला व असोला येथील ३८ वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयात, वसमत रुग्णालयात मुडी येथील ६५ वर्षीय पुरुष तर विरेगाव येथील ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नवीन कोविड सेंटर हिंगोलीत औंढा तालुक्यातील उकळी व कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील एकेका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.