शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यातील १४ लघु तलाव अजूनही जोत्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ ...

हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आतच आहे, तर धरणांतील जलसाठा मात्र ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

हिंगोली जिल्ह्यानजीकच्या तीन धरणांपैकी दोनमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. यामध्ये येलदरी धरणात ५६.४२ टक्के जलसाठा आहे. या धरणात एकूण ५८१, तर उपयुक्त ४५६ दलघमी जलसाठा आहे. मागील वर्षी ५०५ दलघमी उपयुक्त साठा होता. हे प्रमाण ६२.३७ टक्के होते, तर सिद्धेश्वर धरणात यंदा १८४ दलघमी व उपयुक्त १४.८६ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण १८.३५ टक्के आहे. गतवर्षी २९.७९ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी जलसाठा असल्याचे दिसून येत आहे. इसापूर धरणातही सध्या ७८७ दलघमी, तर उपयुक्त ४९२ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण ४९ टक्के आहे. गतवर्षी याच काळात ४३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे या धरणात मागच्या पेक्षा जास्त साठा दिसत आहे.

जिल्ह्यातील लघु तलावांतील साठा आतापर्यंत झालेल्या पावसात फारसा वाढला नाही. हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव, पूर्णा तालुक्यातील मरसूळ, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, काकडदाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील देवधरी हे तलाव जोत्याखाली आहेत, तर हिंगोली तालुक्यात सवड ४ टक्के, सेनगाव तालुक्यात घोडदरी १५ टक्के, ओंढा तालुक्यात वाळकी ७ टक्के, औंढा तालुक्यात औंढा २ टक्के, पुरजळ १ टक्का, वंजारवाडी १ टक्का, पिंपळदरी ६ टक्के, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी १६ टक्के, बोथी १० टक्के, दांडेगाव ५ टक्के, वसमत तालुक्यातील राजवाडी १९ टक्के, अशी १२ तलावांची स्थिती आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांत १५ टक्के साठा

सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यात व जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा बंधाऱ्यात सध्या साठा केला नाही. मात्र, हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथे २२ टक्के, तर परभणी तालुक्यातील रहाटी बंधाऱ्यात ३८ टक्के जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्यांत ५२ टक्के, तर लघु प्रकल्पांत २.१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी अनुक्रमे ५९.४१ व २२.७९ टक्के होता.

वरुणराजाची अवकृपा कायम

यंदा वरुणराजा सुरुवातीलाच प्रसन्न झाल्यासारखी परिस्थिती होती. रोज बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, आता पावसाने ढील दिली. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. ७ जून रोजी सकाळी ८ पूर्वीच्या २४ तासांत फक्त कळमनुरीत ४.५० मि.मी., तर वसमत तालुक्यात ०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात २९.६३ टक्के पर्जन्य झाले आहे. आजपर्यंत हिंगोली २५३ मि.मी., कळमनुरी २६३ मि.मी., वसमत २३८ मि.मी., औंढा २९२ मि.मी., सेनगाव २४२ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे.