शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

जिल्ह्यातील १४ लघु तलाव अजूनही जोत्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ ...

हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आतच आहे, तर धरणांतील जलसाठा मात्र ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

हिंगोली जिल्ह्यानजीकच्या तीन धरणांपैकी दोनमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. यामध्ये येलदरी धरणात ५६.४२ टक्के जलसाठा आहे. या धरणात एकूण ५८१, तर उपयुक्त ४५६ दलघमी जलसाठा आहे. मागील वर्षी ५०५ दलघमी उपयुक्त साठा होता. हे प्रमाण ६२.३७ टक्के होते, तर सिद्धेश्वर धरणात यंदा १८४ दलघमी व उपयुक्त १४.८६ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण १८.३५ टक्के आहे. गतवर्षी २९.७९ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी जलसाठा असल्याचे दिसून येत आहे. इसापूर धरणातही सध्या ७८७ दलघमी, तर उपयुक्त ४९२ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण ४९ टक्के आहे. गतवर्षी याच काळात ४३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे या धरणात मागच्या पेक्षा जास्त साठा दिसत आहे.

जिल्ह्यातील लघु तलावांतील साठा आतापर्यंत झालेल्या पावसात फारसा वाढला नाही. हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव, पूर्णा तालुक्यातील मरसूळ, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, काकडदाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील देवधरी हे तलाव जोत्याखाली आहेत, तर हिंगोली तालुक्यात सवड ४ टक्के, सेनगाव तालुक्यात घोडदरी १५ टक्के, ओंढा तालुक्यात वाळकी ७ टक्के, औंढा तालुक्यात औंढा २ टक्के, पुरजळ १ टक्का, वंजारवाडी १ टक्का, पिंपळदरी ६ टक्के, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी १६ टक्के, बोथी १० टक्के, दांडेगाव ५ टक्के, वसमत तालुक्यातील राजवाडी १९ टक्के, अशी १२ तलावांची स्थिती आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांत १५ टक्के साठा

सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यात व जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा बंधाऱ्यात सध्या साठा केला नाही. मात्र, हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथे २२ टक्के, तर परभणी तालुक्यातील रहाटी बंधाऱ्यात ३८ टक्के जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्यांत ५२ टक्के, तर लघु प्रकल्पांत २.१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी अनुक्रमे ५९.४१ व २२.७९ टक्के होता.

वरुणराजाची अवकृपा कायम

यंदा वरुणराजा सुरुवातीलाच प्रसन्न झाल्यासारखी परिस्थिती होती. रोज बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, आता पावसाने ढील दिली. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. ७ जून रोजी सकाळी ८ पूर्वीच्या २४ तासांत फक्त कळमनुरीत ४.५० मि.मी., तर वसमत तालुक्यात ०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात २९.६३ टक्के पर्जन्य झाले आहे. आजपर्यंत हिंगोली २५३ मि.मी., कळमनुरी २६३ मि.मी., वसमत २३८ मि.मी., औंढा २९२ मि.मी., सेनगाव २४२ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे.