शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'या' व्हिटॅमिन्सची भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमतरता, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:21 IST

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत.

(Image Credit : The Kewl Shop)

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. पण व्हिटॅमिनची शरीरात कमतरता झाली तर याची लक्षणे सहजपणे समजून येत नाहीत. काही लोक दिसायला फिट आणि निरोगी वाटतात, पण त्यांच्यातही व्हिटॅमिन्सची कमतरता असते. गेल्या वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आढळत आहे. भारतात तर ही समस्या अधिक बघायला मिळते.

(Image Credit : Vitamins - LoveToKnow)

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळलं की, ३० ते ७० वयोगटातील लोक व्हिटॅमिनच्या कमतरतेचे शिकार होत आहेत. इंडिया सायन्स वायरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार झालेले लोक खूज जास्त आहेत. जास्तीत जास्त केसेसमध्ये लोक निरोगी दिसतात. त्यामुळे याची लक्षणे आढळून येत नाहीत.

(Image Credit : Medical News Today)

या रिसर्चमध्ये २७० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार होते. रिसर्चमध्ये १४७ पुरूष आणि १२३ महिलांचा समावेश करण्यात आला होता.

(Image Credit : Dr. Weil)

सर्वात जास्त व्हिटॅमिन्स बी १२ ची कमतरता आढळली. याचं मुख्य कारण हेही आहे की, शाकाहारी भोजनांमध्ये Vitamin B12 फार कमी आढळतं. हे व्हिटॅमिन जास्त मासे, अंडी आणि समुद्रात असणाऱ्या जीवांमध्ये असतं. भारतात Vitamin B12 ची समस्या सर्वात जास्त आहे. कारण भारतात जास्तीत जास्त लोक शाकाहारी असतात.

कोणत्या व्हिटॅमिन्सची सर्वात जास्त कमतरता

रिसर्चमधील आकडेवारीनुसार, ४६ टक्के लोकांमध्ये Vitamin B12 ची कमतरता आढळली. ३२ टक्के लोकांमध्ये फॉलेट अर्थात बी ९ ची कमतरता आढळली. त्यासोबतच २९ टक्के लोकांमद्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळली. शहरात राहणारे जास्तीत जास्त लोक उन्हात बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. 

आयर्नचं प्रमाण आणि एनीमिया

(Image Credit : Westchester Health)

शहरी लाइफस्टाइलमध्ये राहणाऱ्या महिला एनीमियाने ग्रस्त असतात. महिलांच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्या कारणाने हीमोग्लोबिन तयार होत नाही. हीमोग्लोबिन कमी असल्याने एनीमिया रोग होतो. भारतात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला एनीमियाच्या शिकार आहेत.

व्हिटॅमिनची गरज कशी भागवाल?

जर तुम्हीही बाहेरून निरोगी दिसत असाल, पण लवकर थकवा येत असेल तर वेळीच टेस्ट करावी. व्हिटॅमिनची कमतरता जर सतत कमी होत गेली तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ शकता. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही यामुळे वाढतो.

१) जास्तीत जास्त चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर Vitamin B12 साठी मोड आलेली कडधान्य, दूध, पनीर सारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हिरव्या भाज्यांसोबतच वेगवेगळी फळंही खावीत. याने शरीरातील वेगवेगळ्या व्हिटॅमिनचा गरज पूर्ण होते.

२) ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही चिकन किंवा मासे खात असाल तर आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस खा.

३) सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची वेळ पाळा. नाश्त्यात मोड आलेली धान्य आणि दूध घ्या. याने जास्तीत जास्त व्हिटॅनिन्स मिळतात.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स