शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्हिटॅमिन्सची भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमतरता, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:21 IST

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत.

(Image Credit : The Kewl Shop)

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. पण व्हिटॅमिनची शरीरात कमतरता झाली तर याची लक्षणे सहजपणे समजून येत नाहीत. काही लोक दिसायला फिट आणि निरोगी वाटतात, पण त्यांच्यातही व्हिटॅमिन्सची कमतरता असते. गेल्या वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आढळत आहे. भारतात तर ही समस्या अधिक बघायला मिळते.

(Image Credit : Vitamins - LoveToKnow)

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळलं की, ३० ते ७० वयोगटातील लोक व्हिटॅमिनच्या कमतरतेचे शिकार होत आहेत. इंडिया सायन्स वायरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार झालेले लोक खूज जास्त आहेत. जास्तीत जास्त केसेसमध्ये लोक निरोगी दिसतात. त्यामुळे याची लक्षणे आढळून येत नाहीत.

(Image Credit : Medical News Today)

या रिसर्चमध्ये २७० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे शिकार होते. रिसर्चमध्ये १४७ पुरूष आणि १२३ महिलांचा समावेश करण्यात आला होता.

(Image Credit : Dr. Weil)

सर्वात जास्त व्हिटॅमिन्स बी १२ ची कमतरता आढळली. याचं मुख्य कारण हेही आहे की, शाकाहारी भोजनांमध्ये Vitamin B12 फार कमी आढळतं. हे व्हिटॅमिन जास्त मासे, अंडी आणि समुद्रात असणाऱ्या जीवांमध्ये असतं. भारतात Vitamin B12 ची समस्या सर्वात जास्त आहे. कारण भारतात जास्तीत जास्त लोक शाकाहारी असतात.

कोणत्या व्हिटॅमिन्सची सर्वात जास्त कमतरता

रिसर्चमधील आकडेवारीनुसार, ४६ टक्के लोकांमध्ये Vitamin B12 ची कमतरता आढळली. ३२ टक्के लोकांमध्ये फॉलेट अर्थात बी ९ ची कमतरता आढळली. त्यासोबतच २९ टक्के लोकांमद्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळली. शहरात राहणारे जास्तीत जास्त लोक उन्हात बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. 

आयर्नचं प्रमाण आणि एनीमिया

(Image Credit : Westchester Health)

शहरी लाइफस्टाइलमध्ये राहणाऱ्या महिला एनीमियाने ग्रस्त असतात. महिलांच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्या कारणाने हीमोग्लोबिन तयार होत नाही. हीमोग्लोबिन कमी असल्याने एनीमिया रोग होतो. भारतात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला एनीमियाच्या शिकार आहेत.

व्हिटॅमिनची गरज कशी भागवाल?

जर तुम्हीही बाहेरून निरोगी दिसत असाल, पण लवकर थकवा येत असेल तर वेळीच टेस्ट करावी. व्हिटॅमिनची कमतरता जर सतत कमी होत गेली तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ शकता. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही यामुळे वाढतो.

१) जास्तीत जास्त चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर Vitamin B12 साठी मोड आलेली कडधान्य, दूध, पनीर सारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हिरव्या भाज्यांसोबतच वेगवेगळी फळंही खावीत. याने शरीरातील वेगवेगळ्या व्हिटॅमिनचा गरज पूर्ण होते.

२) ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही चिकन किंवा मासे खात असाल तर आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस खा.

३) सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची वेळ पाळा. नाश्त्यात मोड आलेली धान्य आणि दूध घ्या. याने जास्तीत जास्त व्हिटॅनिन्स मिळतात.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स