शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

हेच योगा, हेच ध्यान आणि तनमनाला व्यापून उरणारी हीच ती शांती!...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:54 IST

ऐका आपल्या जगण्याचा आवाज आणि व्हा टेन्शनमुक्त..

ठळक मुद्देखाद्यपदार्थातली ऊर्जा जाणवू द्या आपल्या बोटांना.बघा आपल्याच त्वचेचा स्पर्श. शांतपणे.लिहिताना ऐका पेनच्या खरडण्याचा आवाज..चहाचा घोट. रेंगाळू द्या त्याला जिभेवर..

- मयूर पठाडेटेन्शन, टेन्शन, टेन्शन.. काय करायचं या टेन्शनचं?... या टेन्शनवरचा सर्वात सोप्प उपाय म्हणून आपल्याला सांगितलं जातं, योगा करा, ध्यान करा.. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्यातील स्ट्रेस लेवल कमी होईल, आपलं टेन्शन कमी होईल हे अगदी नक्की.. पण मग त्यासाठी क्लास लावा, कोणीतरी समविचारी शोधा, त्यासाठीचे काही तास राखून ठेवा किंवा वेगळे काढा!.. कसं जमायचं हे? म्हणूनच अनेक जण त्याच्या वाटेला जात नाहीत...चिंतामुक्त आयुष्यासाठी तुम्ही त्या त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि त्या त्या क्षणात जगलं पाहिजे, हे तर खरंच, पण ते तर अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी ना कुठल्या क्लासला जाण्याची गरज, ना खास वेळ काढण्याची गरज..खरं तर आपल्या प्रत्येक श्वासात, आपल्या प्रत्येक कृतीत ध्यान आहे, योगा आहे.. बस त्याकडे त्या क्षणापुरतं एकजीव व्हा. बाकी कुठल्याही गोष्टी सोडून त्या क्षणात रममाण व्हा आणि मग बघा.. खरा योग आणि खरं ध्यान त्यातच तर आहे..१- समजा, सकाळी उठल्यावर तुम्ही चहा पिताहात. घ्या त्या चहाचा अनुभव. अगदी शांतपणे. चहाची ती उबदार चव आपल्या जिभेवर रेंगाळते आहे, एक अनामिक एनर्जी आपल्यात संचारते आहे.. घ्या त्याचा अनुभव. फक्त त्या क्षणासाठी..२- मोबाईलवर संगीत चालू आहे. शिरू द्या, भिनू द्या ते संगीत शरीरात. त्या संगीताच्या नादाचे व्हायब्रेशन्स शरीराला जाणवू द्या..३- स्पर्शाचा अनुभव घ्या. स्वत:च स्वत:च्या शरीराला स्पश करा आणि अनुभवा ती जादू..४- साधं चालण्याची गोष्ट घ्या.. अगदी हळूहळू चाला. हळूवार श्वास घेताना पाऊल उचला. श्वास सोडताना पाऊलही खाली ठेवा.. कसली एवढी घाई आहे? फक्त पाच मिनिट.. जमेल?५- काही लिहायला बसला आहात.. अनुभवा पेनवरील बोटाचा दाब, पेनचा पेपरवरील दाब, पेनने लिहित असताना ऐका त्याचा खरडण्याचा आवाज. पेनमधून शाई झरतानाचा अनुभवा तो प्रभावीपणा..६- जेवायला बसला आहात. बोटांना जाणवू द्या, त्या खाद्यपदार्थातली ऊर्जा, त्याचं टेक्स्चर. श्वासात भरून घ्या त्याचा स्वाद.. राहा की त्या खाद्यपदार्थाबरोबर. जगा थोडा वेळ त्याच्याबरोबर.. फक्त दोन मिनिट..हेच ध्यान, हेच योगा आणि आपल्या तनमनाला व्यापून उरणारी हीच ती शांती. घ्या तिचा अनुभव..