शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

कमी वयात 'या' जीवघेण्या आजारांचे शिकार ठरत आहेत तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 17:00 IST

सध्याचा काळात आजारपण हे जेष्ठांसह तरूणांमध्ये ही उद्भवतात. जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे.

(image credit -ibelieve.com)

 सध्याचा काळात आजारपण हे जेष्ठांसह तरूणांमध्ये ही उद्भवतात. जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत. बदलत चाललेली जीवन शैली, आणि खाण्या पिण्याच्या सवयी यांमुळे तरुणांमध्ये आजार उद्भवत आहेत. त्यामुळे २५ वयापासूनच तरुणांनी सर्तक राहायला हवे.

(Image credit_talkspace.com)

1) शाळा, महाविद्यालयातील मुलांना फास्टफुड जास्त खाल्ल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. चविष्ट आणि तिखट चवीच्या या पदार्थांचे सेवन लवकर थांबवले नाही. तर विविध आजारांनी शरीराला अपाय होऊ शकतो. दिनचर्येत नियमित फास्टफूडचा वापर होत असल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतात. यासाठी फास्टफूड खाणे टाळले पाहिजे फास्टफूड पदार्थ हे तिखट आणि अतितेलकट असल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते. यामुळे अ‍ॅसिडीटीसारखा त्रास जास्त वाढतो. शिवाय यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

(image credit- moldbgonega.com)

२) साधारणपणे २२ ते ३०  वयातील मुलांमध्ये हृदय विकाराच्या झ़़टक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यांसारख्या समस्यांपासून वाचायचे असेल तर महिन्यातू़न किमान एकदा मेडीकल टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याचजोडीला जीवनशैलीत बदल केला तर आजारांपासून मुक्तता होईल.

(image credit -.inverse.com)

३) रक्तदाबासंबंधीत आजार हे तरुणांमध्ये दिसून येत आहे. अपुरी झोप, ताण- तणाव यांमुळेही आजार वाढीस लागत आहे. रक्तदाब वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे न घेणे. असे आढळून आले आहे की या समस्येवर ५ पैकी एका व्यक्तीवर उपचार करण्यात येतात व त्यापैकी फक्त ५ टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात असतो. त्यामुळे जर तुम्हाला उच्चरक्तदाबाची  समस्या असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधं घेणे गरजेचे आहे.

(image credit-guideposts.org)

४) तरुण मुलांमध्ये आजारपणा जास्त असण्याचे मुख्य कारण डिप्रेशन आहे. दैनंदिन कामाचा आणि नातेसंबंधांमधील तणाव, नोकरीच्या समस्या, भविष्याचे, मुलांसाठीचे नियोजन यातला तणाव या वयात  दिसतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य